उरण : माजी खासदार दिबा पाटील यांच्या जन्मशताब्दी व नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याच्या मागणीसाठी रविवारी भिवंडीचे खासदार सुरेश(बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी ते जासई अशी भव्य कार रॅली काढून जासईत नामकरणासाठी एल्गार करण्यात आला. या रॅलीची सांगता दिबांचे जन्मस्थान असलेल्या जासई येथे करण्यात आली. यावेळी झालेल्या मेळाव्यात दिबा हे देशव्यापी नेते होते. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात कारावास,कूळ कायदा लागू करण्यासाठी परिश्रम घेणारे,ओ बी सा ना आरक्षण मिळविण्यासाठी विरोधी पक्ष नेतेपदाचा त्याग त्याग केला. स्त्री भ्रूण हत्या विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करण्याचा पुढाकार झाला.
शेतकऱ्यांना साडेबारा टक्के आणि विकसित भूखंड देणारा कायदा देशासाठी लागू करण्यात आला आहे. यातून याच श्रेय ही दिबांचे आहे. त्यामुळे दिबा पाटील हे राष्ट्रीय नेते आहेत. या राष्ट्रीय नेत्यांच नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे अशी जोरदार मागणी केली. या रॅलीत रायगड,ठाणे,पालघर,मुंबई, नवी मुंबई या जिल्ह्यातील समाज हजारोच्या संख्येने उपस्थित होता. खासदार संजय दिना पाटील, आगरी समजा अध्यक्ष दशरथ पाटील,माजी आमदार मनोहर भोईर,बाळाराम पाटील,राजू पाटील, भावना घाणेकर,संतोष केणे, राजेंद्र पाटील,संतोष घरत,सरपंच जासई,निलेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीकडे केंद्र/राज्य सरकारचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीची सुरुवात भिवंडी माणकोली येथून सकाळी ९ वाजता निघणार असून नवी मुंबईतून पुढे जासई करिता मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे दिबा पाटील यांच्या त्यागातून साडेबारा टक्के भूखंडाचा लाभ घेतलेल्या प्रत्येकाला आवाहन करण्यात येत आहे की दिबा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने रॅली चे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहावे आणि रॅली मध्ये सहभागी ही व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ही रॅली भिवंडी माणकोली,रेती बंदर खारीगाव, शीळ डोंबिवली कळवा नाका, ठाणे शहर आणि घोडबंदर रोड , दिघा रेल्वे स्थानका समोर (विटावा, आनंद नगर, दिघा , ऐरोली सिमेन्स कंपनी समोर (ऐरोली आणि दिवा ग्रामस्थ), रबाळे रेल्वे स्थानका समोर ( रबाळे, गोठिवली, आणि तळवली ग्रामस्थ), मुलुंड ऐरोली मार्गे, घणसोली नाका ( घणसोली ग्रामस्थ), रिलायन्स गेट (कोपरखैरणे आणि महापे ग्रामस्थ), कोपरी गाव हनुमान मंदिर (कोपरी, पावणे, बोनकोडे आणि जुहूगाव ग्रामस्थ), अरेंजा सर्कल वाशी (तुर्भे, सानपाडा, वाशी ग्रामस्थ), नेरूळ प्रशांत कॉर्नर सिग्नल ( जुईपाडा, शिरवणे, सारसोळे, कूकशेत) करावे चाणक्य सिग्नल (नेरूळ, दारावे आणि करावे ग्रामस्थ), नवी मुंबई पालिका मुख्यालय (बेलापूर, शहाबाज, अग्रोली आणि दिवाळे ग्रामस्थ), दिबा पाटील विमानतळ रेतीबंदर गेट, चिंचपाडा ब्रिज खाली (चिंचपाडा आणि पनवेल ग्रामस्थ), मोठा ओवळा गाव ( पारगाव ओवळा ग्रामस्थ), जासई – लोकनेते दिबा पाटील मंगल कार्यालय येथे सभेने समारोप करण्यात आला.