नवी मुंबई : नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर विशेष उपक्रमाद्वारे कायद्याचा बडगा उगारण्यात येत आहे. चारचाकी गाडी चालवताना सीट बेल्ट न लावणारे केवळ दोन तासांच्या विशेष कारवाईत तब्बल ९०५ जण आढळून आले. रस्ता सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यावर वाहतूक पोलीस विभाग भर देत आहे. यासाठी विशेष मोहीम राबवली जात असून शुक्रवारी सीट बेल्ट मोहीम राबविण्यात आली.

दुपारी १२ ते २ या केवळ दोन तासांच्या विशेष मोहिमेत ९०५ जणांवर कारवाई करण्यात आली. चारचाकी गाडीचा अपघात झाल्यावर मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश लोकांनी सीट बेल्टचा वापर न केलेला आढळून येतो. सीट बेल्ट हे प्रवाशांच्या सुरक्षेचे साधन असले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ही मोहीम राबविण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील १६ वाहतूक शाखांमधील कर्मचाऱ्यांनी एकूण ९०५ वाहन चालकांवर निर्णायक कारवाई केली. 

seven injured after machinery in trailer
लष्कर भागात मोटारीची दहा दुचाकींना धडक; दुचाकीस्वार तरुण जखमी
Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस

हेही वाचा : उरण नगरपरिषदेची कचरा वाहने बंद पडू लागली, कर्मचाऱ्यांचा भर बाजारात दे धक्का

हेही वाचा : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंदला पाठिंबा देण्याच्या तयारीत?

सीट बेल्ट हे प्रवाशांच्या सुरक्षेचे साधन आहे. दुर्दैवाने अपघात झाला तर प्रवाशांचा जीव सीट बेल्टमुळे वाचू शकतो. वाहतूक नियम हे सुरक्षेसाठीच असतात, त्यांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे