पनवेल : खारघर येथे ४ ते १२ फेब्रुवारी या दरम्यान संत शिरोमणी श्री निवृत्ती महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच ठिकाणी महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी लाखो दासभक्त खारघरमध्ये आले होते. त्यानंतर देशभरातून गायत्री परिवाराचे भक्तांनी याच ठिकाणी अश्वमेध यज्ञ राज्यपालांच्या उपस्थितीत झाला होता. त्यानंतर आताखारघर उपनगर शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. मात्र येथे सतत होणाऱ्या अध्यात्मिक सोहळ्यांमुळे शहराची ओळख अध्यात्मिकतेची शिकवण देणारी वसाहत अशी होत आहे.

हेही वाचा : पनवेल : व्काॅरीच्या स्फोटात एका कामगाराने प्राण गमावले, दोन जखमी

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
Sri Swami Samarth Maharaj s prakat din Celebrations to Commence in Akkalkot with Religious and Cultural Programs
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रम
Aditya Thackeray Yavatmal
‘वापरा आणि फेका’ हीच भापजची नीती; महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांची टीका
Uday Samant Nagpur
“रत्नागिरी – सिंधुदुर्गवर आमचाच हक्क” – उदय सामंत

आठवड्याभराच्या या सोहळ्यासाठी देशातील तीन पीठांचे आचार्य, शंकराचार्य, संतांचे वंशज, वारकरी संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ कीर्तनकार, वारकऱ्यांसह राज्यातून हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याचा दावा आध्यात्मिक विचार प्रचारक सामाजिक संस्थेने केला आहे. या कार्यक्रमादरम्यान अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. पहाटे चार ते सकाळी दहा या वेळेत काकड आरती, हरिकीर्तन, पाच हजार ज्ञानेश्वरी वाचक, टाळकरी, तीन हजार मृदंग वादक आणि हजारो श्रोतृवृंद उपस्थित राहणार आहे.