लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला अलिबाग-विरार बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्प रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रकल्पाच्या भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध करण्यास सुरूवात केली आहे. भूसंपादनासाठी वाढीव मोबदला द्या, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

By way of 22 stalled redevelopment projects of cessed buildings
उपकरप्राप्त इमारतींचे रखडलेले २२ पुनर्विकास प्रकल्प मार्गी
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
maharastrra cabinet meeting decision to complete stalled sra project in mumbai
‘झोपु’ प्रकल्पांना लवकरच वेग; रखडलेले २२८ प्रकल्प पूर्ण करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; दोन लाख सदनिकांची बांधणी
metro, Thane, Thane metro news, Thane latest news,
Thane Metro : ठाण्याच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारचा हिरवा कंदील, सहा डब्यांच्या मेट्रोवर अखेर शिक्कामोर्तब
dharavi redevelopment project
धारावीतील पाच इमारतींच्या हस्तांतरात अडचणी; ‘डीआरपी’कडून ६४२ कोटी मिळण्याची हमी द्यावी, म्हाडाची भूमिका
Paving the way for the construction of Kamathipura redevelopment
कमाठीपुरा पुनर्विकासाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा
Alibag Virar road, land acquisition, Raigad,
अलिबाग विरार मार्गिकेतही विरोधाचा खोडा, दोन वर्षांत रायगडात २० टक्केही भूसंपादन पूर्ण नाही
patra chawl, houses, minority group,
मुंबई : २,३९८ घरांच्या प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे, पत्राचाळीत उच्च गटासाठी १००० चौरस फुटांची १३३ घरे, मात्र अत्यल्प गट बाद

एमएमआरडीएच्या माध्यमातून अलिबाग ते विरार दरम्यान बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. यामुळे अलिबाग ते विरार हे अंतर अवघ्या काही तासांत पूर्ण करता येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. रस्त्याबरोबरच मेट्रो रेल्वेचे जाळेही या माध्यमातून विस्तारले जाणार आहे. प्रकल्पाचे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील भूसंपादन मार्गी लागले असतांनाच आता रायगड जिल्ह्यात या प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

आणखी वाचा- उरणमधील एनएमएमटी बससेवा बंद

मागण्यांचे निवेदन

भूसंपादनासाठी गुंठ्याला ५० लाख रुपये इतका दर द्या, एमआरटीपी कायद्याऐवजी २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार प्रकल्पासाठी भूसंपादन करा, महसूल नोंदी गटबुक नकाशे अद्यायावत करा, ज्यांची घरे संपादीत होत आहेत. त्यांना बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्या आणि पुनर्वसनासाठी तिप्पट क्षेत्रफळाची जागा द्या, घरांचे बांधकाम होत नाही तोवर घरभाडे द्या, प्रकल्प उभारणीनंतर जे उत्पन्न मिळेल त्यातील १० टक्के रक्कम शेतकऱ्यांना, तर १० टक्के रक्कम ग्रामपंचायतींना मिळावी, स्थानिकांना टोल माफी मिळावी या सारख्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. संघर्ष समितीच्या वतीने या संदर्भातील एक निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे.