बोईसर: पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावरील वैतरणा ते डहाणू या स्थानकांदरम्यान बोईसर रेल्वे स्थानक हे सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. दैनंदिन ४५ ते ५० हजार प्रवासी बोईसर स्थानकातून प्रवास करीत असून यामध्ये तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. वाढत्या गर्दीमुळे बोईसर स्थानकामध्ये प्रवाशांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. विरार डहाणू चौपदरीकरणाच्या कामामुळे स्थानक परिसरात प्रवासांच्या सोयीसाठी नवीन सुविधा निर्माण करण्यास अडथळे येत आहेत.

बोईसर रेल्वे स्थानकातील प्रमुख समस्या :

•  प्रवाशांना पश्चिमेकडून रेल्वे स्थानकात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना  रिक्षा, खाजगी वाहने  यांचा अडथळा पार करावा लागतो.

* दक्षिणेकडील पादचारी पुलावरून रेल्वे स्थानकात प्रवेश आणि बाहेर  बाहेर पडताना खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते.

३.  तिकीट खिडकी आणि वाहनतळाची सुविधा नसल्यामुळे पूर्व भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे.

४. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे उत्तर दिशेकडील पादचारी पुलाला जोडणाऱ्या उद्वाहनाची सुविधा अनेक वेळा बंद होते. उत्तर आणि दक्षिण दोन्ही दिशांना सरकत्या जिन्यांची मागणी.

५. दक्षिणेकडील वळणावळणाच्या (झिगझॅग) पुलामुळे जास्तीचे सामान सोबत असणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.

६. तीन पैकी दोन तिकीट व्हॅलिडेटिंग यंत्रे बंद.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७. विरार डहाणू चौपदरीकरणाच्या कामामुळे बोईसर रेल्वे स्थानक इमारतीचा काही भाग बाधित होणार आहे. नवीन रेल्वे स्थानक इमारतीचे काम सुरू असल्यामुळे स्थानकामध्ये नवीन सुविधा निर्माण करण्यास अडथळा येत आहे.