पालघर : आज दिवसभर पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या वळीवच्या पावसाने वीज वितरण यंत्रणेची मोठ्या प्रमाणात हाणी झाली. विक्रमगड, मनोर, पालघर, मोखाडा या भागात ३३ केव्ही वीज वाहिनीवरील १२ हून अधिक खांब पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असून पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

पालघर जिल्ह्यात सुरू झालेल्या वळीवाच्या पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब व झाडांच्या फांद्या पडल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा दुपारपासून पंडित आहे. विक्रमगड येथील आठ खांब सावडे गावाजवळ जमीनदोस्त झाले आहेत. मनोर गावाजवळ चार खांब पडले आहेत. सोबतच विविध भागात वृक्ष उन्मळून पडल्याने व झाडांच्या फांद्या पडल्याने वीजवाहिन्या पडल्या आहेत. परिणामी जिल्ह्यातील विविध भागात वीजपुरवठा बाधित झाला असून तो सुरळीत करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त महावितरण कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.

वादळामुळे जव्हार ते मोखाडा वीज वाहिनीचा एक खांब पडला आहे. संततधार सुरू असलेल्या पावसात महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तसेच नोंदणीकृत कंत्राटदारांचे कर्मचारी अविरत काम करत आहेत. शक्य तितक्या तातडीने दुरुस्तीचे काम करून बाधित वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी सूचित केले असून ते प्रत्येक बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन संबंधित भागातील वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालघर महावितरण चे सुनील भारंबे यांनी केले आहे.

पावसामुळे बारा विद्युत खांब पडले

दुपारी दोन वाजताच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, मनोर व पालघर व इतर भागात झालेल्या ओळीवरच्या पावसामुळे विक्रमगड भागातील 33 केवी चे आठ विद्युत खांब सावदे गावाजवळ, तसेच जव्हार व मनोर येथे चार खांब पडले आहेत. तसेच वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारांवर देखील झाडाच्या फांद्या पडल्यामुळे विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. यामुळे विक्रमगड सह मनोर व पालघर येथील विद्युत प्रवाह पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे. मात्र विक्रमगड येथे विद्युत पुरवठा पूर्ववत होण्यास उद्या सायंकाळी होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भुयारी मार्गांमध्ये पाणी

केळवे येथील रोठा फाटक क्र ४४ येथील भुयारी मार्ग आज झालेल्या पावसात जन्म झाला आहे. तसेच पालघर नवली येथील पर्यायी भुयारी मार्गात देखील पाणी साचल्याने पूर्व पश्चिम वाहतूक करणे गैरसोयीचे होत आहे. उड्डाणपुलाचे काम अद्याप पर्ण झाले नसल्याने नागरिकांना प्रवास करणे त्रासदायक होत असून पाऊस सुरू होण्याअगोदर पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.