तुकाराम झाडे

हिंगोली: दोन वेगवेगळया विचारसरणीत वाढलेल्या आणि विरोधी पक्षांकडून ‘युवराज’ या प्रतिमेत अडकविलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आदित्य ठाकरे यांना पाहण्यासाठी कळमनुरी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. सदृढ लोकशाहीसाठी हे अधिक चांगले असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Leaders of India will have a power show tomorrow and organize a meeting at Ramlila ground in Delhi
‘इंडिया’च्या नेत्यांचे उद्या शक्तिप्रदर्शन, दिल्लीत रामलीला मैदानावर सभेचे आयोजन; विरोधकांच्या एकजुटीला बळ
chetan narke, kolhapur lok sabha, chetan narke shivsena
हातकणंगलेतून लढण्याचा शिवसेनेच्या प्रस्तावाला नकार; कोल्हापुरात लढणारच – डॉ. चेतन नरके

शिवसेना हा आमचा नैर्सगिक मित्र आहे का, असा प्रश्न भारत जोडो यात्रे पूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे शिवसेनेचा यात्रेत सहभाग असेल का, कोण सहभागी होईल याविषयीचे तर्कविर्तक आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे आता बाजूला पडले आहेत. काँग्रेसच्या यात्रेला राज्यातील विविध पक्षांकडून दिला जाणारा पाठिंबा लक्षणीय मानला जात आहे. यात्रे दरम्यान चालताना राहुल गांधी यांच्याबराेबर राज्यातील उद्योगाची सुरू असणाऱ्या पळवापळवीवर तसेच सरकार विरोधी बोलणाऱ्यांची केल्या जाणाऱ्या मुस्कटदाबीवरही चर्चा झाल्याचे समजते.

हेही वाचा : ‘बी फॉर बारामती’साठी सीतारामन पुन्हा बारामतीच्या मैदानात

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना व काँग्रेसमध्ये फारशी कटुता निर्माण झाली नाही. बाळासाहेब थोरात हे समन्वयकाची भूमिका सांभाळत होते. भारत यात्रेचेही ते समन्वयक आहेत. यात्रेमध्ये आदित्य ठाकरे यांचे चालणे हे शिवसेना- काँग्रेसच्या संबंधावर दीर्घकाळ परिणाम करणारे असतील, असेही सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांबरोबरच पक्षीय राजकारणात नसणाऱ्या अनेकांचा भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. अनेक लेखक, कवीही राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.