बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडून भाजपासह सरकार स्थापन केल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच काँग्रेस आणि आरजेडीच्या दबावामुळेच नितीश कुमारांनी बिहारमध्ये जाती आधारित सर्वेक्षण केले, असे म्हटले होते. दरम्यान, या टीकेला आता नितीश कुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी काहीही बरळतात असे ते म्हणाले, त्यामुळे बिहारमधील जाती आधारित सर्वेक्षणावरून श्रेयवादाची लढाई बघायला मिळत आहे.

हेही वाचा – उमेदवारांच्या यादीवरून काँग्रेसची टीका, समाजवादी पक्षानेही दिले प्रत्युत्तर; इंडिया आघाडीतील मतभेद आणखी वाढणार?

Archana Patil Chakurkar
अर्चना पाटील चाकूरकरांच्या विरोधात लातूर शहर भाजपातील कार्यकर्त्यांची एकजूट
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Jagan Mohan Reddy
नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप
Tirupati Prasad Controversy
Prakash Raj: ‘तुझ्या दिल्लीतील मित्रांमुळे धार्मिक तणाव’, तिरुपती प्रसाद वादावर अभिनेते प्रकाश राज यांची पवन कल्याण यांच्यावर टीका
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
jayant patil secret explosion on bhagyashree atrams entry in sharad pawar ncp
गडचिरोली : “राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या संपर्कात,”जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

काय म्हणाले नितीश कुमार? :

“राहुल गांधी काहीही बरळतात. खरं तर बिहारमध्ये जाती आधारित सर्वेक्षण करण्याचा ठराव मी २०१९-२० मध्ये मंजूर केला होता. त्यावेळी केंद्र सरकारने जाती आधारित सर्वेक्षण करण्यास नकार दिला, त्यामुळे मी पुढे येऊन बिहारमध्ये जाती आधारित सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आम्ही नऊ राजकीय पक्षांबरोबर बैठकाही घेतल्या होत्या. मुळात एनडीएमधून बाहेर पडण्यापूर्वीपासून मी जाती आधारित सर्वेक्षणाविषयी बोलत होतो”, असे प्रत्युत्तर नितीश कुमार यांनी दिले.

पुढे बोलताना त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर तपास यंत्रणांद्वारे दबाव आणला जात असल्याच्या आरोपांवरही प्रतिक्रिया दिली. “तपास यंत्रणांकडून जी कारवाई सुरू आहे, ती जुन्या प्रकरणांशी संबंधित आहे, हा त्यांच्या कामाचा भाग आहे”, असे ते म्हणाले.

तेजस्वी यादव यांच्या टीकेलाही दिले प्रत्युत्तर :

यावेळी बोलताना त्यांनी तेजस्वी यादव यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. तेजस्वी यादव यांनी त्यांच्या १७ महिन्यांच्या कार्यकाळाची तुलना नितीश कुमार यांच्या १७ वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाशी केली होती. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, “ज्यावेळी मी बिहारची सत्ता हाती घेतली, त्यावेळी तेजस्वी यादव लहान होते. २००६ नंतर मी अनेक विकासाची कामे हाती घेतली. २००६ पूर्वी बिहारमधील तरुणांना सरकारी नोकऱ्याही मिळत नव्हत्या, आम्ही सत्तेत आल्यानंतर तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या.”

हेही वाचा – २०२० पासून हेमंत सोरेन आरोपांच्या कचाट्यात; निवडणूक आयोगानेही केली होती अपात्रतेची शिफारस

राहुल गांधींनी केली होती टीका :

‘भारत जोडो न्याय यात्रा दरम्यान पूर्णिया येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली होती. “बिहारमध्ये जातनिहाय सर्व्हे करावा, अशी मागणी आम्ही नितीश कुमार यांच्याकडे केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने नितीश कुमार यांच्यावर दबाव टाकून सर्व्हे करून घेतला. पण, दुसऱ्या बाजूनेही त्यांच्यावर दबाव आला. कारण भाजपाला या देशात जातनिहाय सर्व्हे करायचा नाही. या देशात दलित, आदिवासी, वंचित यांची संख्या किती? हे भाजपाला जाणून घ्यायचे नाही, त्यामुळे भाजपाच्या दबावापुढे नितीश कुमार झुकले. भाजपाने त्यांना मार्ग दाखविला आणि नितीश कुमार त्या मार्गाने चालू पडले”, असे राहुल गांधी म्हणाले होते. तसेच “बिहारची अवस्था अशी आहे की, मुख्यमंत्र्यांवर थोडासा दबाव पडला तरी ते यू-टर्न घेतात”, अशी बोचरी टीकाही राहुल गांधी यांनी केली होती.