दोन वेळा पंजाबचं मुख्यमंत्रिपद भूषवलेले अमरिंदर सिंग आणि चार वेळा पटियालाच्या खासदार प्रनीत कौर यांची मुलगी आणि भाजपाच्या नेत्या जय इंदर कौर (५७) या आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. जय इंदर कौर यांनी आपल्या वडिलांसह सप्टेंबर २०२२ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केलाय. २०२१ मध्ये अमरिंदर सिंग यांची मुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी नवीन राजकीय गणितं जुळवण्यास सुरुवात केली. जय इंदर कौर आता राज्य भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत आणि नुकत्याच जाहीर झालेल्या १९ सदस्यीय राज्य निवडणूक समितीमधील एकमेव महिला सदस्य म्हणून त्यांचा समावेश आहे.

आई-वडील अनेक दशके काँग्रेसमध्ये असताना राजकारणात येण्यासाठी वयाच्या ५० वर्षांपर्यंत का वाट पाहावी लागली?

मी माझ्या आई-वडिलांना १९९८ पासून निवडणूक प्रचारात मदत करीत आहे, पण मी कधीही काँग्रेसचे सदस्यत्व घेतले नव्हते. जेव्हा माझे वडील २०१७ मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा मी आमच्या गावी पटियाला येथील लोकांना दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. मी राजकारणात किंवा त्यांच्या अधिकृत कामात कधीच सहभागी नव्हते, तरी माझ्या वडिलांच्या कार्यकाळात दिलेली आश्वासने पूर्ण व्हावीत, यासाठी मी पटियालामध्ये काम केले. तेव्हा मला समजले की, खूप काही करायचे आहे आणि मी माझ्या पालकांबरोबर सार्वजनिक कामात जोमाने सहभागी झाले. काँग्रेस सोडल्यानंतर जेव्हा माझ्या वडिलांनी पंजाब लोक काँग्रेस (PLC) हा त्यांचा स्वतःचा पक्ष सुरू केला, तेव्हा मी २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रचार केला. माझ्या वडिलांनी भाजपामध्ये प्रवेश केला, तेव्हाच मी त्यांच्या उत्तरार्धात राजकारणात उडी घेण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून मी कोणत्याही प्रकारे लोककल्याणासाठी योगदान देऊ शकेन. त्याआधी कौटुंबिक बांधिलकीमुळे मला राजकारणासाठी इतका वेळ कधीच मिळाला नव्हता.

Election Commission cautious stance on Narendra Modi Rahul Gandhi statements
भाषणे नेत्यांची; नोटिसा पक्षाध्यक्षांना! मोदी, राहुल यांच्या विधानांबाबत निवडणूक आयोगाची सावध भूमिका
narendra modi sonia gandhi pti
“मैदान सोडून पळून जाणारे आता…”, पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींना टोला
Leaders of India will have a power show tomorrow and organize a meeting at Ramlila ground in Delhi
‘इंडिया’च्या नेत्यांचे उद्या शक्तिप्रदर्शन, दिल्लीत रामलीला मैदानावर सभेचे आयोजन; विरोधकांच्या एकजुटीला बळ
parful patel
प्रफुल पटेल यांना निर्दोषत्व! विमान भाडेकरार घोटाळाप्रकरणी सीबीआयकडून फाइल बंद

हेही वाचाः धाराशिवमधून निवृत्त सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांना भाजपची उमेदवारी ?

काँग्रेसने तुमचे वडील अमरिंदर यांना पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याकडे तुम्ही कसे पाहता?

आम्हाला खूप त्रास झाला. त्यांनी हे अशा प्रकारे करायला नव्हते पाहिजे. माझ्या कार्यपद्धतीवर तुम्ही खूश नसाल तर मी राजीनामा देऊ शकतो, असे त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला सांगितले होते. ‘नाही, नाही तुम्हाला आमच्यासाठी निवडणूक लढवावी लागेल,’ असंही त्यांनी सांगितले. काँग्रेसला सहज फोन करून त्यांचा निर्णय कळवता आला असता. त्यांनी ज्या पद्धतीने ते केले, ते अजिबात योग्य नव्हते. मला खूप त्रास झाला, संपूर्ण कुटुंब खूप दुखावले गेले. त्यांनी काँग्रेसला इतकी वर्षे दिली. तुम्ही अशा लोकांना टाकून देऊ शकत नाही. ते दोन वेळा मुख्यमंत्री होते, ज्यांनी पक्ष आणि पंजाबच्या लोकांसाठी खूप काही केले, परंतु गांधींनी त्यांचे कधीही आभार मानले नाहीत. माझी आई अजूनही पटियाला येथील काँग्रेसच्या विद्यमान खासदार होत्या आणि त्यांनी तिलाही पक्षातून निलंबित केले. मला आता कळले आहे की, भाजपाबरोबर काम करणे चांगले आहे. मी काँग्रेसचा भाग कधीच नव्हती, पण त्यांना त्यांच्या निष्ठावंत नेत्यांचा आदर करण्याची गरज आहे.

हेही वाचाः सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे भाजपला आव्हान, संघर्ष हाणामारीपर्यंत

तुम्ही लोकसभा निवडणूक लढवाल का?

नाही, माझी आई (प्रनीत कौर) पटियालामधून निवडणूक लढवणार आहे. लवकरच त्या अधिकृतपणे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. मला संधी कदाचित आणखी २ ते ३ वर्षांनी मिळेल. त्या मतदारसंघात आधीच कार्यरत आहेत, चार वेळा खासदार आहेत आणि अजूनही सक्रिय आहेत. त्या भाजपाच्या विजयी उमेदवार आहेत.

पंजाब भाजपाचे अध्यक्ष सुनील जाखड अकाली दल-भाजपा युतीची वकिली करीत आहेत, तुमचा निर्णय काय?

युती नेहमीच चांगली असते. त्यामुळे पक्ष मजबूत होण्यास मदत होते. सुनील जाखड यांना नेमकी परिस्थितीत माहीत आहे. साहजिकच दोन्ही पक्ष एकत्र आल्यास चांगली कामगिरी होणार आहे.

पंजाबमध्ये विशेषत: शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर तुम्हाला भाजपाविरोधी भावना दिसत आहे का?

भावना खूप बदलल्या आहेत आणि येत्या काही दिवसांत त्यात आणखी बदल होणार आहे. यापूर्वी भाजपाची एसएडीशी युती असताना ग्रामीण जागा अकाली दलाकडे होत्या, त्यामुळे आम्ही कधीही खेड्यापाड्यात पोहोचलो नाही. आता आम्ही लोकांशी थेट संवाद साधत आहोत. खरे तर जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच खेड्यापाड्यात भाजपाचे बूथ आले. शेतकरी आंदोलने दुर्दैवी आहेत, पण ती कोणी सुरू केली हे आपल्या सर्वांना माहीत आहे. जगजीत सिंग डल्लेवाल आणि सर्वन सिंग पंधेर या दोन शेतकरी नेत्यांचे आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित होते, असे मला वाटते. नाहीतर कोणता शेतकरी क्रेन आणि बुलडोझर आणणार? आप आणि काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष आपापल्या परीने त्यांना पाठिंबा देत होते. पण भविष्यात पंजाबचे शेतकरी चांगले काम करतील, अशी आशा आहे.

पंजाबमधील सर्वात महत्त्वाचा महिला प्रश्न कोणता? ज्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे?

मुख्य समस्या म्हणजे औषधे आहे. प्रत्येक घरामध्ये औषधांचा तुटवडा जाणवतो आहे. गावातील महिला असहाय्य आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे. सध्याचे ‘आप’ सरकार काम करीत असल्याचा दावा करते, परंतु खरी परिस्थिती वेगळीच आहे. केंद्रातील भाजपाचे नेते याबाबत गंभीर आहेत. त्यांना काय करायचे आहे, याबाबत त्यांनी आधीच योजना आखली आहे. लागोपाठच्या सरकारांनी एका विशिष्ट टप्प्यापर्यंत ड्रग्जच्या विरोधात पावले उचलली असतील, परंतु AAP अंतर्गत गेल्या दोन वर्षांत समस्या पूर्वी कधीही नव्हती, इतकी वाढली आहे आणि महिलांना याचा फटका बसत आहे. मुले व्यसनाधीन होतात आणि ते चोरी करू लागतात. ते स्वतःच्या घरातून गॅस सिलिंडरही चोरतात. यामुळे पंजाबमधील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, विशेषत: रस्त्याने जाणाऱ्या महिलांकडून सोनसाखळी, कानातले हिसकावून नेण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.

तुमच्या वडिलांसह कुटुंबाविषयी एक वेगळीच धारणा आहे, तुम्ही राजघराण्यातील सदस्य असल्याकडे का पाहिले जाते?

विरोधक खूप काही बोलतात. परंतु तुम्ही जाऊन कोणालाही विचारा, माझे वडील मुख्यमंत्री असताना किती फिरायचे? माझी आईदेखील सतत फिरते, तिच्या सर्व फोन कॉल्सला स्वतःच उत्तर देते. भाजपामध्ये आल्यापासून मी राज्यभर फिरत आहे. लोकांना ते माहीत आहे. राजघराण्याचा सदस्या हा फक्त एक वारसा आहे, बाकी काही नाही.