पुणे : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नव्या स्वरूपाच्या पदवी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षांपासून सुरू होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षांपासून मल्टिपल एन्ट्री आणि मल्टिपल एक्झिट पर्यायासह चार वर्षांचा (आठ सत्रांचा) बहुविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रम राबवण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारसी शासनाने स्वीकारल्यानंतर अंमलबजावणी, अभ्यासक्रमांचे स्वरूप, श्रेयांक रचना, मूल्यमापन या बाबतचे निर्देश शासन निर्णयाद्वारे देण्यात आले. नव्या रचनेनुसार तीन वर्षांचे १२० श्रेयांक पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळेल. चार वर्षांचे १६० श्रेयांक पूर्ण केल्यावर ऑनर्स किंवा संशोधन पदवी दिली जाईल. प्रत्येक सत्रातील ४० टक्के अभ्यासक्रम हा स्वयम् प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन पद्धतीने शिकण्याची मुभा राहणार आहे. या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात दहा श्रेयांकांचा रोजगारक्षम जोड अभ्यासक्रम आणि कार्यप्रशिक्षण (इंटर्नशीप) समाविष्ट आहे. तसेच पाच वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमासाठी दोनशे श्रेयांक प्राप्त करावे लागतील. अभ्यासक्रमात उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. 

More Stories onपुणेPune
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A four year degree course fresh academic years directives higher and technical education department ysh
First published on: 07-12-2022 at 01:32 IST