राज्यात वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध लादणार की नाही यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत रविवारी (५ जून) पुण्यात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादले जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंधने लाणायला नको असं सांगितलं आहे. मात्र, टास्क फोर्सने निर्बंध लादण्यास सांगितल्यावर नाईलाजास्तव बंधने आणावी लागतील, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

अजित पवार म्हणाले, “तुम्हीच प्रश्न विचारता आणि तुम्हीच मास्क घातला नाही. मी मास्क घालून बोलत आहे. मी जीव तोडून सांगतो की प्रश्न विचारताना मास्क घाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला आज म्हणाले की, अजित बंधन आणायला नको. लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करायला काही हरकत नाही.”

“असं असताना माझ्या दोन्ही बाजूला बसलेल्यांनी मास्क घातलेला नाही. मीच लावून बसलो आहे,” असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या डाव्या बाजूला बसलेले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि उजव्या बाजूला बसलेलेल पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर बाळासाहेब पाटील यांनी आपल्या खिशातील मास्क काढून घातला.

हेही वाचा : “विद्यापीठाच्या निवडणुकीत माझ्या बायकोला बिनविरोध निवडून दिलं, पण…”; पुण्यात उदय सामंत यांच्यासमोर अजित पवारांचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही मास्कबाबत आवाहन करत आहोत, पण आम्हाला टास्क फोर्स किंवा इतर मंडळींनी निर्बंध लादण्यास सांगितल्यावर नाईलाजास्तव बंधनं आणावी लागतील,” असंही अजित पवार यांनी यावेळी नमूद केलं.