“वाइन ही दारू असून सुपर मार्केटमध्ये ठेवण्याची गरज नाही. तिथं लहान मूल, महिला जातात. दुकानात वाइनला परवाना देऊन हे सरकार काही लोकांचा फायदा करत आहे. नागपूरमध्ये सुपर मार्केट असोसिएशनने वाइन ठेवणार नाही,” असं सांगत अमृता फडणवीस यांनी वाइनवरून महाविकास आघाडीला घेरलं आहे. विद्यार्थी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे. अन्यथा आजची वेळ विद्यार्थ्यांवर आली नसती, असं देखील त्यांनी नमूद केलं. अमृता फडणवीस लोणावळा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. 

अमृता फडणवीस म्हणाल्या, “विद्यार्थी, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न राज्यसरकार दुर्लक्षित करत आहे. काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी हे सरकार झटत आहे. आजची परिस्थिती विद्यार्थ्यांवर यायला नको होती.  दुकानात वाइनला परवाना देऊन शेतकऱ्यांच्या नावाने काही लोकांचा फायदा केला जातोय. हे अयोग्य आहे. नागपूर सारख्या शहरात सुपर मार्केट असोसिएशन वाइन ठेवणार नाही असं म्हणत आहे.”

MP Anup Dhotre demands cash credit for agricultural loan supply to central government
अकोला : कृषी कर्ज पुरवठ्याला हवे ‘कॅश क्रेडिट’, खा. अनुप धोत्रे यांची केंद्र सरकारकडे मागणी
government employee joining rss
आता सरकारी कर्मचाऱ्यांना RSS च्या कार्यक्रमांमध्ये जाण्यावर बंदी नाही, केंद्र सरकारनं ५८ वर्षांपूर्वी घातलेली बंदी उठवली
Eateries on Kanwar routes across UP must display owners names Chief Minister Yogi Adityanath
हिंदू नावे धारण करुन होते मांसविक्री? योगी सरकारने सर्व खाद्यविक्रेत्यांना दिले ओळख उघड करण्याचे आदेश
Nagpur, smart prepaid meters, Devendra Fadnavis, Anti Smart Electric Meter Citizen Struggle Committee, Mahavitaran, protest, electricity sector
सरकारवर लोकांचा विश्वास नाही? स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात पुन्हा आंदोलन…
missing complaint of guardian minister vijaykumar gavit
पालकमंत्री बेपत्ता! थेट पोलीस ठाण्यात तक्रार; कुठे घडला हा प्रकार? वाचा…
Israel air strike on gaza news in marathi
Israel Air Strike on Gaza : गाझामध्ये मोठा नरसंहार! इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ७१ जणांचा मृत्यू; ‘या’ मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला केलं होतं लक्ष्य
Salary hike for power company officers employees
वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनवाढ
shivsena thackeray faction and bjp
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट-भाजपमध्ये संघर्षाची नांदी

हेही वाचा : ‘नन्हे पटोले’ म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांबद्दल विचारलं असता नाना पटोले म्हणाले, “त्या आमच्या…”

“आघाडी सरकारमधील अर्ध्या नेत्यांना माहिती नसतं नेमकं की…”

“जे जागरूक नागरिक आहेत ते यापासून लांब राहतील. शेवटी वाइन ही दारूच आहे. सुपर मार्केटमध्ये लहान मूलं, महिला येतात. तिथं वाइनची गरज नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामधील अर्ध्या नेत्यांना माहिती नसतं नेमकं की महाराष्ट्रात काय सुरू आहे,” असं म्हणत अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.