दत्ता जाधव

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिचौंग चक्रीवादळाची वाटचाल वायव्य दिशेने सुरू आहे. मिचौंग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर बाष्प असल्याने पुढील तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यावर कोणतीही वातावरणीय प्रणाली सक्रिय नाही. मात्र, बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ तयार झाले आहे. त्याची वाटचाल वायव्य दिशेने सुरू आहे. मिचौंग चक्रीवादळ आपल्या सोबत मोठ्या प्रमाणावर बाष्प घेऊन येत आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील तीन दिवस मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोलीसह विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊसही पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

High Court clarified to file a Public Interest Litigation regarding the pollution of garbage on the beaches of Mumbai print news
अस्वच्छ किनाऱ्यांवरून पालिकेची कानउघाडणी; समुद्रातील ‘प्लास्टिक’ सागरी जीवांवर नाही, तर मानवांवरही दुष्परिणाम
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Israeli attacks hitting all areas of Lebanon
हेजबोलाचा आणखी एक नेता ठार; इस्रायलचे लेबनॉनवरील हल्ले सुरूच
Israel-Lebanon conflict,
लेबनॉनशी युद्धविरामाची अमेरिकेची सूचना इस्रायलनं फेटाळली; सर्वशक्तिनिशी हेजबोलाशी लढण्याचे लष्कराला आदेश!
cyclonic condition in Chhattisgarh will bring heavy rainfall to North Madhya Maharashtra for two days
राज्यात आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस जाणून घ्या, परतीचा पाऊस कधी सुरू होतो
Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain : कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधारेचा अंदाज; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्यांत कसा पाऊस पडणार
Intensity of low pressure area persists over Bay of Bengal
बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची तीव्रता कायम
kenya cheetah india marathi news
विश्लेषण: नामिबिया, दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता केनियातून भारतात येणार चित्ते! गुजरातमध्ये चित्ता प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता किती?

विदर्भ आणि मराठवाडा वगळता राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात शुक्रवारपर्यंत ढगाळ हवामानाची शक्यता आहे. शुक्रवारनंतर आकाश निरभ्र होईल. तसेच किमान तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने घट होईल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी राज्यात कमाल ३० अंश सेल्सियस, तर किमान १९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदवले गेले.