पुणे : मराठा आरक्षणाबाबतच्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे असलेल्या सर्व सुनावण्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या पुनर्विचार याचिकेच्या निकालानंतरच घेतल्या जातील, असा निर्णय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. राज्य मागासवर्ग आयोगाची सुनावणी आणि बैठक आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पुण्यात झाली. मराठवाडा भागातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आयोगाकडे आलेल्या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. छावा संघटनेचे (मराठवाडा) राजेंद्र दाते पाटील (अभ्यासक), किशोर चव्हाण (सल्लागार), प्रा. गोपाळ चव्हाण, सचिन गावंडे, रामभाऊ जाधव यांनी आयोगासमोर मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत म्हणणे मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा