पुणे : राज्यात दंगली होतील, हे प्रकाश आंबेडकर यांना कसे माहीत? अशी विचारणा केंद्रीय सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी येथे केली. माहिती लपविणे गुन्हा आहे. त्यामुळे आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. तीन डिसेंबर नंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता आहे. पोलीस ठाण्यांना सतर्कतेची सूचनाही देण्यात आहे. चार राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर काहीही होऊ शकते, असा धक्कादायक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात केला होता.

हेही वाचा : प्रवाशांना नेमकी विषबाधा कशामुळे? रेल्वेकडून कारणांचा शोध सुरु

Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
fugitive gangster arrested , Lonavala , MPDA ,
‘एमपीडीए’ कारवाई केलेल्या फरार गुंडाला लोणावळ्यातून अटक
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
mastermind , construction businessman murder ,
पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत, दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप; “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी बिक्कडने पळवले, वाल्मिक कराड आणि…”
What Suresh Dhas Said ?
Suresh Dhas : “…यांनी बीडचा ‘बिहार’ नाही तर ‘हमास’, ‘तालिबान’ केला”, सुरेश धस यांची टीका

केंद्र सरकारच्या योजनांची माहिती आणि लाभ पोहोचविण्यासाठी आयोजित भारत विकास संकल्प यात्रेवेळी राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आंबेडकर यांना अटक करण्याची मागणी केली. राजकीय महत्त्व संपलेले लोक असे बोलतात. दंगल होणार असेल तर त्याचा सबळ पुरावा द्यावा लागतो. दंगल कोण करणार ? कुठे होणार ? याची माहिती द्यावी लागते. आंबेडकरांना याची माहिती असेल तर माहिती लपविणे गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, असे राणे यांनी सांगितले.

Story img Loader