छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी आजपासून आंदोलन करणार आहेत. त्यांच्या या आंदोलनावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजी राजे यांना उपमुख्यमंत्री पवार यांनी चर्चेतून यावर तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे. हा प्रश्न चर्चेने सोडवता येतो. यापैकी काही प्रश्नं ही केंद्र सरकारच्या हातात आहे, त्यामुळे पुन्हा केंद्राकडे भूमिका मांडणं गरजेचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले. मंत्री जयंत पाटील हे परिसंवाद यात्रेनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आज माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपांवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “अनेक आरोप केल्याशिवाय लोक लक्ष देत नाहीत. मोठ्या माणसांची नाव घेतल्याशिवाय बातम्या तयार होत नाहीत. येणाऱ्या जिल्हा परिषदा, महानगर पालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत नागरिकांना विचलित करायचं. मध्यप्रदेश, पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणूकापासून लोकांच लक्ष विचलित करायचं वेगवेगळ्या लोकांना अटकेत टाकायचं, असे प्रकार सध्या चालू आहेत,” असं पाटील म्हणाले.

Chhatrapati Shivaji Maharajs chiefs in the field in support of Udayanaraje bhosle
उदयनराजेंच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा सरदारांचे थेट वंशज मैदानात
Rajwardhan Kadambande on Shahu Maharaj
“मी छत्रपती शाहूंच्या रक्ताचा वारसदार, कोल्हापूरकरांना माझे…”, राजवर्धन कदमबांडे काय म्हणाले?
uddhav balasaheb thackeray criticized mahayuti candidate sandipan bhumre
मद्य परवान्यांचा विषय ठाकरे गटाकडून ऐरणीवर; उमेदवारी जाहीर होताच भुमरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…