लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बारामतीच्या निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप करणे, म्हणजे विरोधकांनी एकप्रकारे पराभवाची कबुलीच दिली आहे. बारामतीच्या मतदानानंतर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आढावा घेतला. त्यानुसार बारामतीची लढाई सुळे विरूद्ध पवार अशी होती आणि त्यात पवारच जिंकणार, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
What Devendra Fadnavis Said?
देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, “बारामतीत जिंकणार तर…”
sharad pawar ajit pawar marathi news
“माझे बंधू आजारी असताना शेवटच्या काळात…”, शरद पवारांची अजित पवारांवर थेट टीका: म्हणाले…
Praful Patel on Uddhav Thackeray
प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “उद्धव ठाकरे भाजपाबरोबर…”
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…

आणखी वाचा-पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मतदारांना आमिष! म्हणाले, पोशाख करतो, अंगठी करतो…

पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत खासदार तटकरे बोलत होते. ते म्हणाले, ‘सन २०१४ मध्ये विधानसभेचे निकाल हाती येण्यापूर्वीच भाजपला बाहेरून पाठिंबा द्यायचा निर्णय सिल्वर ओक या ठिकाणी झाला. भाजपसोबत सत्तेत जाण्याचेही ठरले होते. मात्र, काही कारणांनी तसे होऊ शकले नाही. सन २०१६ मध्ये भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय झाला. मात्र, शिवसेना नको, असे सांगण्यात आले. त्यावर शिवसेना-भाजप युती अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केली असून शिवसेनेला बाहेर काढता येणार नाही. तुम्ही भाजप-शिवसेना युतीमध्ये सहभागी व्हा, त्यानंतर शिवसेनेने काही निर्णय घेतल्यास पाहू, असे तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे तेव्हाही सत्तेत जाण्याचे बारगळले. त्यानंतर पुन्हा सन २०१९ मध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता. भाजपसोबत जाण्याचा निर्णय आधी झाला, त्यानंतर आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत चर्चेला गेलो. आता आमचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून तो तसूभरही बदलणार नाही.’