लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या प्रकरणांत नागरिकांना दिलासा देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अभय योजना आणली आहे. या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या अडीच महिन्यात राज्यात २१ हजार ९०३ प्रकरणांमधून तब्बल १०७ कोटींचा महसूल जमा झाला आहे.

Customs, Customs Seize 9610 Grams of Gold, Mumbai Airport, Arrest Four, customs arrest 3 foreign women, gold, gold smuggling, Mumbai news,
मुंबई : पावणे सहा कोटींच्या सोन्यासह चौघांना अटक; सीमाशुल्क विभागाची कारवाई, आरोपींमध्ये तीन परदेशी महिला
Mumbai, Foreign National, Cocaine filled Capsules, Mumbai airport, Foreign National Arrested, Foreign National Arrested at Mumbai Airport, Foreign National arrested with cocaine, cocaine of rs 10 crore,
मुंबई : अमली पदार्थांची तस्करी प्रकरणी परदेशी व्यक्तीला अटक, पोटातून बाहेर काढल्या १० कोटीच्या कोकेनच्या ११० कॅप्सूल
tiger attacked and killed young man in forest
तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेला अन् वाघाची शिकार झाला
Mumbai income tax officer arrested marathi news, cbi income tax officer arrested marathi news
मुंबई: लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला अटक
Loksatta anvyarth Anti Israel Rage at American Universities
अन्वयार्थ: अमेरिकी विद्यापीठांत इस्रायलविरोधी रोष
The central government has not given new permission for onion export but the open export of onion from the country is closed
कांद्याची खुली निर्यात बंदच, केंद्राचे आकडे गेल्या वर्षभरातील
seven injured after machinery in trailer
लष्कर भागात मोटारीची दहा दुचाकींना धडक; दुचाकीस्वार तरुण जखमी
Pregnant Woman, Injured by Falling Stone, Nerul, police register fir, Blasting Work Halted, navi mumbai news, marathi news, blasting for construction site, nerul construction site, construction site, builder construction site, nerul railway station west,
स्फोटप्रकरणी विकासकावर गुन्हा; नेरुळमधील स्फोटांचे काम बंद, नगररचना विभागाची विकासकाला कारणे दाखवा नोटीस

राज्य सरकारने १ डिसेंबर २०२३ पासून अभय योजना लागू केली. त्यामध्ये दोन टप्पे करण्यात आले आहेत. पहिला टप्पा १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ असा होता. मात्र, पहिल्या टप्प्यात मुद्रांक शुल्क आणि दंडामध्ये जास्त सवलत असल्याने आणि नागरिकांच्या मागणीनुसार या टप्प्याला शासनाने २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे सवलतीचा लाभ घेण्यासाठी पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर प्रकरणे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे दाखल होत आहेत.

आणखी वाचा-माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे एक पाऊल मागे म्हणाले, शिरूरची जागा भाजप किंवा राष्ट्रवादीला…’

या योजनेचा दुसरा टप्पा ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे. राज्यातील ४३ मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या अडीच महिन्यांत एकूण ३९ हजार १२२ प्रकरणे दाखल झाली आहेत. यातील २१ हजार ९०३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यापोटी शासनाला १०७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे, तर उर्वरित १७ हजार २१९ प्रकरणे निकाली काढण्याचे काम करण्यात येत आहे, असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे सहमहानिरीक्षक नंदकुमार काटकर यांनी सांगितले.

विभागनिहाय राज्यातील स्थिती

विभाग निकाली प्रकरणेवसूल रक्कम
मुंबई १०,०१८ ३० कोटी ४१ लाख
कोकण ३९९९ १९ कोटी ६४ लाख
पुणे ३५७९ ३१ कोटी ३३ लाख
उर्वरित महाराष्ट्र४३०७ २५ कोटी ६२ लाख