लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या प्रकरणांत नागरिकांना दिलासा देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अभय योजना आणली आहे. या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या अडीच महिन्यात राज्यात २१ हजार ९०३ प्रकरणांमधून तब्बल १०७ कोटींचा महसूल जमा झाला आहे.

Indrayani, cows, rescue, Pimpri,
पिंपरी : दुथडी वाहणारी इंद्रायणी, तीन तास बचाव कार्याचा थरार, तीन गायींना जीवनदान!
Pune, PMRDA, heavy rain, emergency department, flood situation, rescue operations, fire brigade, Khadakwasla dam, Shivne bridge, sophisticated systems, precautions, coordination, pune news,
पीएमआरडीएचा आपत्कालीन विभाग सक्रिय.. तीन पथके, दोन रबर बोटी, रेस्क्यु उपकरणासह मदतीसाठी रवाना
home ministry warns over fake government e notices
शासकीय कार्यालयांतून ई-नोटीस? केंद्रीय गृह विभागाचा नागरिकांना सावधानतेचा इशारा
drug smuggler Nagpur
उपराजधानीत ड्रग्स तस्करांचा पुन्हा सुळसुळाट, कुरिअरने मागविले…
Nashik, liquor, smugglers, excise vehicle,
नाशिक : उत्पादन शुल्कच्या वाहनास धडक देणारे दोन दारू तस्कर ताब्यात
The High Court gave a clear order to the Divisional Commissioners and District Collectors to use government shakti and privilege to pave the way for VNIT
‘व्हीएनआयटी’ ऐकत नसेल तर रस्ता सुरू  करण्यासाठी ‘शक्ती’ वापरा ,उच्च न्यायालयाचे आदेश…
Car crashes as driver loses control amid sound of Insta reel
पाच मित्र…भरधाव कार…इंस्टावर रिल टाकण्यासाठी मोबाईल हातात घेतला अन्…
dior armani bag controversy
लाखोंची ‘Dior’ बॅग तयार होते चार हजारात? कामगारांचं होतंय शोषण; काय आहे बड्या ब्रॅंडमागचे सत्य?

राज्य सरकारने १ डिसेंबर २०२३ पासून अभय योजना लागू केली. त्यामध्ये दोन टप्पे करण्यात आले आहेत. पहिला टप्पा १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ असा होता. मात्र, पहिल्या टप्प्यात मुद्रांक शुल्क आणि दंडामध्ये जास्त सवलत असल्याने आणि नागरिकांच्या मागणीनुसार या टप्प्याला शासनाने २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे सवलतीचा लाभ घेण्यासाठी पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर प्रकरणे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे दाखल होत आहेत.

आणखी वाचा-माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे एक पाऊल मागे म्हणाले, शिरूरची जागा भाजप किंवा राष्ट्रवादीला…’

या योजनेचा दुसरा टप्पा ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे. राज्यातील ४३ मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या अडीच महिन्यांत एकूण ३९ हजार १२२ प्रकरणे दाखल झाली आहेत. यातील २१ हजार ९०३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यापोटी शासनाला १०७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे, तर उर्वरित १७ हजार २१९ प्रकरणे निकाली काढण्याचे काम करण्यात येत आहे, असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे सहमहानिरीक्षक नंदकुमार काटकर यांनी सांगितले.

विभागनिहाय राज्यातील स्थिती

विभाग निकाली प्रकरणेवसूल रक्कम
मुंबई १०,०१८ ३० कोटी ४१ लाख
कोकण ३९९९ १९ कोटी ६४ लाख
पुणे ३५७९ ३१ कोटी ३३ लाख
उर्वरित महाराष्ट्र४३०७ २५ कोटी ६२ लाख