खासदार अमोल कोल्हे यांनी अखेर बैलगाडापुढे घोडीवर स्वार होऊन घाट गाजवला आहे. निवडणुकीपूर्वी दिलेले वचन त्यांनी यानिमित्ताने पूर्ण केलं आहे. बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर अमोल कोल्हे हे दिलेला शब्द पाळणार का? असा खोचक टोला महाविकास आघाडीतीलच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला होता. अमोल कोल्हे यांनी यातून आढळरावांना प्रत्युत्तर दिलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अटी आणि शर्थींसह बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर मावळमधील नाणोली, आंबेगाव येथील लांडेवाडी येथे बैलगाडा शर्यती पार पडत आहेत. आज (१६ फेब्रुवारी) खेडमधील दावडी लिंबगाव येथे मानाच्या खंडोबा घाटात बैलगाडा शर्यत पार पडली. या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे यांनी बैलगाड्या पुढे घोडेस्वारी केली.

cm siddaramaiah
कर्नाटकात ५० खोके प्रयोग; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर केला खळबळजनक आरोप
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
friendly fight nashik
नाशिकमध्येही मैत्रीपूर्ण लढत करावी – काँग्रेसची मागणी
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

व्हिडीओ पाहा :

यावेळी बैलगाडा शौकीन आणि प्रेमींमध्ये एकच जल्लोष सुरू होता. काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हे बैलगाडी पुढे घोडेस्वारी करणार का? असा प्रश्न शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विचारत टोला लगावला होता.

शिवाजी आढळराव पाटील नेमकं काय म्हणाले होते?

शिवाजी आढळराव पाटील म्हणाले होते, “खासदार अमोल कोल्हे यांना निमंत्रण दिलं होतं. कोणावर टीका करून तोंड खराब करायचं नाही. काही पत्रकार विचारत होते, सध्याच्या खासदारांना निमंत्रण दिलं का? हो त्यांना जाहीर निमंत्रण दिलं की बैलगाडा शर्यतीसाठी घोडीवर बसायचं असेल तर लांडेवाडीत या.”

“प्रचारादरम्यान अमोल कोल्हे म्हणाले होते की बैलगाडा शर्यती सुरू होतील तेव्हा हा पठ्ठ्या बारीच्या पुढे पहिल्या बारीवर बसेल. म्हणून मी त्यांना विनंती केली. निवडणुकीत जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यासाठी का होईना आमच्या घाटात या,” असा खोचक टोला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी लगावला आहे. 

अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले होते?

अमोल कोल्हे म्हणाले होते, “हा अमोल कोल्हे मालिका विश्वातून निवृत्ती घेणार आणि तुमच्या सेवेसाठी उपस्थित असणार आहे. तसा दुसरा शब्द बैलगाडा मालकांना देतो. ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल. त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी पुढे घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो.”