यंत्रणेतील दुरुस्तीच्या कामामुळे महापालिकेकडून पाणीपुरवठा होणार नसल्याने पालिका हद्दीतील सर्व स्थानकांमधील पाणी गुरुवार व शुक्रवारी बंद राहील. गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी पिण्याचे पाणी सोबत घेऊन यावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
गुरुवारी दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या संपूर्ण दिवशी पाणी उपलब्ध होणार नाही. त्याचप्रमाणे शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या दोन्हीही दिवशी रेल्वे स्थानकांमध्ये पाणी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी बसविण्यात आलेल्या यंत्रणेतून पाणी मिळू शकणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी स्थानकावर येताना पर्यायी माध्यमातून पाणी सोबत घेऊनच प्रवास करून रेल्वेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.