लोणावळा : लोणावळा शहरात होणारी कोंडी विचारात घेऊन जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन जाणारी जड वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. लोणावळा शहरात दिवसा जड वाहनांना कायमस्वरुपी बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

लोणावळा, खंडाळा परिसरात वर्षाविहारासाठी मुंबई-पुण्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. शनिवार आणि रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी असते. लोणावळा शहरातून जाणाऱ्या मुंबई-पुणे महामार्गाचा वापर ट्रक, कंटेनर करतात. जड वाहतुकीमुळे वाहतुकीचा वेग संथ होऊन लोणावळा शहरात ठिकठिकाणी कोंडी होते. लोणावळा शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सकाळी सहा ते रात्री दहा यावेळीत सर्व प्रकारच्या जड वाहनांना कायमस्वरुपी बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

हेही वाचा…पुणेकरांना गुड न्यूज! स्वारगेटहून आता थेट मंत्रालयासाठी शिवनेरी सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जड वाहनांमुळे लोणावळा शहरात गंभीर अपघात झाले आहेत. लोणावळ्यातील मनशक्ती केंद्र आणि खंडाळ्यातील बॅटरी हिल दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्यात आली असून, मुंबई-पुणे महामार्गावरून जाणारी जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. लोणावळा शहरातून जाणाऱ्या जड वाहनांनी द्रुतगती मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.