पर्यावरण आणि तापमानवाढ यातील बदलासंदर्भात माहिती देत त्याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती पोहचण्यासाठी ‘पुणे क्लायमेट वॉरिअर्स’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरातील ३० शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीमध्ये शिकणारे सुमारे २० हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊ शकतील.  

वनराई, असोसिएशन फॉर लर्निंग, एज्युकेशन, रीसर्च अँड ट्रेनिंग (अलर्ट) आणि सिम्बायोसिस सेंटर फॉर क्लायमेट चेंज अॅड सस्टेनेबिलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी दिली.  वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, अलर्टचे रवी चौधरी, फाल्गुनी गोखले आणि ॲड. दिव्या चव्हाण-जाचक या वेळी उपस्थित होत्या. 

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Nashik Education Department, Steps Up Efforts, Increase Voter, Turnout Through SVEEP Initiative, Systematic Voters Education and Electoral Participation program, students,
उन्हाळी सुट्टीतही एसव्हीईईपी उपक्रमासाठी धडपड
Record Number of Students Register for MHTCET
अभियांत्रिकी, औषधनिर्माण प्रवेशासाठी स्पर्धा, सीईटीसाठी किती विद्यार्थ्यांची नोंदणी?

वंदना चव्हाण म्हणाल्या, “या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वातावरण बदलासंदर्भात माहिती देत उपाययोजना करण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासंदर्भात मदत पुरवली जाणार आहे. तसेच पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवनवीन शोध घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विविध उपक्रम आणि स्पर्धांद्वारे पर्यावरण, निसर्ग आणि सजीवांची काळजी घेण्याची संस्कृती विकसित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. विविध स्पर्धा आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.” 

पुणे हवामान योद्धे निर्माण करण्यात येणार –

तसेच, “पर्यावरण बदल आणि तापमान वाढीमुळे उष्णतेच्या लाटा, वाढते तापमान, ढग फुटी, अतिवृष्टी, पूर, वादळे, वितळणारे हिमनग, समुद्र पातळीत वाढ, वाळवंटीकरण, जंगलातील वणवे, प्राणीजीवाला धोका आणि जगभरातील नवनवीन रोगांचा फैलाव अशा विविध संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या स्तरावर जागृती घडवून पुणे हवामान योद्धे निर्माण करण्यात येणार आहेत.”  असं देखील खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितलं आहे.