पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. जुलै महिन्यात सरासरी भरून काढलेल्या पावसाची त्यापेक्षा अधिकची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेले पाण्याचे टँकर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जुलैअखेरीस जिल्हा अखेर टँकरमुक्त झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

-१२ दिवस दमदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले –

यंदा उन्हाळ्यात जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील वाड्यांवर पहिला टँकर सुरू करण्यात आला. त्यानंतर कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली होती. कडक उन्हामुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन, पाणीचोरी व गळती आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे बाधित नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. याशिवाय यंदा पूर्वमोसमी पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली. तसेच मोसमी पाऊस वेळेत सक्रिय होऊनही संपूर्ण जून महिन्यात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील टँकरची संख्या ६० च्यापुढे गेली होती. ४ जुलैपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली. त्यानंतर सलग ११-१२ दिवस दमदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. त्यामुळे टप्प्याटप्प्याने टँकरची संख्या कमी होत गेली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune district finally tanker free water tankers operating in rural areas of the district are closed pune print news msr
First published on: 29-07-2022 at 18:10 IST