आपल्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडेंचं एक विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. शिवछत्रपतींना इंग्रजांच्या प्रसूतीगृहातून बाहेर काढा. महाराजांचा जन्म हा शिवनेरीवर झाला आहे. त्यामुळे त्यांची जयंती हिंदू पंचांगाच्या तिथीनुसारच साजरी झाली पाहिजे, असं ते म्हणाले. पुण्यातील जुन्नरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं.

हेही वाचा – “गुवाहाटीला असताना श्री श्री रविशंकर यांचा फोन आला आणि…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘त्या’ फोनकॉलचा प्रसंग!

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”
chhagan bujbal
“माझा निर्णय दिल्लीतून ठरला, मात्र…”; नाशिकच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचे विधान
Delhi aap
आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, भाजपाही केजरीवालांच्या राजीनाम्यावर ठाम; दिल्लीत सत्ताधारी-विरोधकांची निदर्शने!

नेमकं काय म्हणाले संभाजी भिडे?

“आमची राज्य सरकारला विनंती आहे. शिवछत्रपतींना इंग्रजांच्या प्रसूतीगृहातून बाहेर काढा. महाराजांचा जन्म हा शिवनेरीवर झाला आहे. त्यामुळे त्यांची जयंती हिंदू पंचांगाच्या तिथीनुसारच साजरी झाली पाहिजे. आज त्यांचे नको इतके पुतळे उभारले जात आहेत. अरबी समुद्रात त्यांचे स्मारक होणार आहे. या समुद्रातील स्मारकाचा आणि शिवछत्रपतींच्या आयुष्याचा काहीही संबंध नाही. या स्मारकावर कोट्यवधी रुपये खर्च होणार आहे. सरकारने हे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नये”, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली.

हेही वाचा – “मी ३० ते ३२ वर्ष राजकीय जीवनात आहे, सत्तेत असतांना मी कधीच…”, अजित पवार यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

“शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर हिंदू स्वराज्य स्थापन झालं आणि ‘शिवशक’ सुरू झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि देशाच्या पंतप्रधानांनी हे लक्षात घ्यावं, ही स्वाभिमान ठासून भरलेला असा हा ‘शिवशक’ आहे. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावर तो पोहोचला पाहिजे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – विधानपरिषद निवडणूक : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय; महाविकास आघाडीला मोठा धक्का!

दरम्यान, यापूर्वी संभाजी भिडेंची अनेक विधानं चर्चेत राहिली आहेत. काही दिवसांपूर्वीत त्यांनी महिला पत्रकाराशी बोलताना “तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.