पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सन  २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर पवार हे भाजपबरोबर जाणार नाहीत, याची खात्री काय? अशी  विचारणा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक  प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यासंदर्भात केली. पवार यांची मैत्री काँग्रेसबरोबर असले तरी, निवडणुकीनंतर ते भाजप बरोबर असतील, असेही त्यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. अन्वर शेख यांच्या प्रचारार्थ आंबेडकर यांची सभा हडपसरमधील कन्यादान मंगल कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.  शिरूरचे उमेदवार डॉ.अन्वर शेख, जिल्हाध्यक्ष राज कुमार, कमलेश उकरंडे यावेळी उपस्थित होते.

Sharad Pawar, health,
शरद पवार यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे सोमवारचे सर्व कार्यक्रम रद्द
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Raj and uddhav
राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये फरक काय? नारायण राणेंनी भरसभेत सांगितला दोघांचाही स्वभाव; म्हणाले, “मी बऱ्याच वर्षांपासून…”
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
Ujjwal Nikam and vijay Wadettivar
हेमंत करकरेंच्या मृत्यूप्रकरणी विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पाकिस्तान सरकारला…”
sharad pawar ajit pawar marathi news
“माझे बंधू आजारी असताना शेवटच्या काळात…”, शरद पवारांची अजित पवारांवर थेट टीका: म्हणाले…
Uddhav Thackeray On Narendra Modi
उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर; म्हणाले, “आजारपणात माझी चौकशी करता अन् तुमचे पाव उपमुख्यमंत्री…”

हेही वाचा >>> पिंपरी: श्रीरंग बारणेंसाठी अभिनेता गोविंदा सरसावला! केला बारणेंचा प्रचार

भाजपला सत्ता मिळाली तर, ते भारतीय राज्यघटना बदलतील असा आरोपही आंबडकर यांनी केला. ते म्हणाले, की देशभरातील मतदानाची घसरती टक्केवारी चिंतेचा विषय असून भाजपने नागरिकांचा अपेक्षाभंग केल्याने मतदानाचे प्रमाण घसरत आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही पक्षाने मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली नाही. त्यावरून या पक्षाचा खरा चेहरा पुढे आला आहे.  स्मार्ट पुणे शहरात पाण्यासाठी पुरेसा पाणीपुरवठा करता येत नाही. निवडणुकीत वंचित पक्षाची ताकद वाढली आहे. तरूणांची संख्या देशात मोठी आहे. त्यांचे शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगार गरजेचे आहेत, असे डॉ. अन्वर शेख यांनी सांगितले.