पुणे : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित राहीले. मात्र व्हिडिओ द्वारे त्यांनी केलेल्या ‘मी पुन्हा येईन’ या  विधानाची चर्चा कार्यक्रमात रंगली.

फडणवीस यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्याचे नियोजित होते. मात्र विधीमंडळाच्या अधिवेशनामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र व्हिडिओद्वारे त्यांनी उपस्थित शेतक-यांबरोबर संवाद साधला.

हेही वाचा >>>उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

२०१५ पासून मी या उपक्रमाशी जोडलो गेलो आहे. जलयुक्त शिवार या मोहिमेतून शेतकऱ्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे.पाणी फाउंडेशनचाही त्यामध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि दिल्लीतील तातडीची बैठक यामुळे कार्यक्रमला इच्छा असूनही उपस्थित रहाता आले नाही. मात्र पुढच्या वर्षी मी नक्की येईन, असे त्यांनी सांगितले.