”विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र टीका द्वेष नसायला हवा मात्र अलीकडे ते पाहायला मिळते. राजकारण चुकीच्या दिशेला जातं का?” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमास ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील,खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह आजीमाजी आमदार, पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती.

Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही
D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन
Why Protests in Hong Kong over New National Security Law Approved by Legislative Council Hong Kong
चीनकडून हाँगकाँगची गळचेपी? नवीन सुरक्षा कायद्याविषयी जगभर निषेधसूर का?

यावेळी शरद पवार यांनी ”काश्मिरमधील एक घटक निघून गेला, त्यावर एक सिनेमा आला, काँग्रेसवर टीका झाली. मन जोडण्याऐवजी मन तोडण्याच काम झालं. समाजात विद्वेष पसरायला मदत केली जाते, गांधींवर टीका टिप्पण्णी या चित्रपटाच्या माध्यमातून केली जाते. काश्मीर मधून काश्मिरी पंडित बाहेर पडले तेव्हा सत्तेत काँग्रेस नव्हती, तर व्हीपी सिंह यांची सत्ता होती. भाजपाचं त्याला सहकार्य होते म्हणजे भाजपाच्या सत्तेच्या काळात काश्मिरी पंडित बाहेर गेले. मतभेद, मतभिन्नता असू शकते मात्र परस्परबाबत सन्मान असण्याची गरज आहे. गांधी, नेहरूंनी देशाला दिशा दिली नुसते स्वातंत्र्य दिले नाही. देशाला एकसंघ ठेवायचं आहे.” असंही बोलून दाखवलं.