पवना धरणात बुडून मुंबईतील तेरा वर्षीय शाळकरी मुलीसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पाण्यात उतरलेल्या सात जण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने सात जण बुडाले. त्या पैकी पाच जणांना वाचविण्यात यश आले.

हेही वाचा >>> गणेश भक्तांसाठी मध्य मुंबईत वाहनतळाची व्यवस्था

Karanjwade Colony, youth, beaten,
पनवेल : करंजवाडे वसाहतीमध्ये तरुणाला युवकांकडून बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू
bhaindar uttan marathi news
भाईंदरच्या उत्तन येथील घटना, खड्ड्यात बुडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
Malegaon, daughters, died,
वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुलींसह तिघांचा अपघातात मृत्यू
What Aditya Thackeray Said About Mihir Shah
Hit and Run: आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, “मिहीर शाह राक्षस आहे, पाच मिनिटांसाठी त्याला…”
Pune Hit and Run Two on-duty policeman hit by speeding car
पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या दोघांना भरधाव कारने उडवलं; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, एक गंभीर
Worli Accident Today BMW Car hits Two Wheeler
वरळीत भरधाव BMW वाहनानं महिलेला १०० मीटरपर्यंत फरफटत नेल्यानंतर मृत्यू, वाहन मालक शिंदे गटाचा पदाधिकारी ताब्यात
court sentence life imprisonment till death for molesting minor girl zws
अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार; शेजाऱ्याला मृत्यूपर्यंत जन्मठेप तर आजोबाला १० वर्षे सक्तमजुरी
man died, contractor, seat of lift,
उदवाहकाची जागा ठेकेदाराने मोकळी सोडल्याने ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

आर्या दीपक जैन (वय १३), समीर कुलदीप सक्सेना (वय ४३) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पाण्यात बुडालेले पायल समीर सक्सेना (वय ४२), लक्ष्य सक्सेना (वय १४), यश सक्सेना (वय ८), आदी चुगानी (वय १४), अंश सुरी (वय १४) यांना वाचविण्यात यश आले आहे. सक्सेना कुटुंबीय मुंबईतील प्रभादेवी भागातील रहिवासी आहेत. सक्सेना कुटुंबीय आणि त्यांचे मुलांचे मित्र पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते. फांगणे गावाजवळ पवना धरणातील पाण्यात आर्या, समीर, पायल, लक्ष्य, यश, आदी, अंश पाण्यात उतरले. त्या वेळी पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने सर्व जण बुडाले. सात जण पाण्यात बुडाल्याची माहिती पवनानगर चौकीतील पोलीस हवालदार रफीक शेख आणि विजय गाले यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. पाण्यात बुडालेल्या सात जणांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. उपचारांपूर्वीच आर्या जैन, समीर सक्सेमा यांचा मृत्यू झाला, अशी माहिती लाोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली. ऐन गणेशोत्सवात शाळकरी मुलीसह दोघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.