भारतातील शहरे कोणत्याही नियोजनाशिवाय वाढत राहिली. खेडय़ांची शहरे झाली, परंतु तेथे मूलभूत पातळीवर कोणतेच बदल झाले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगातील सर्वाधिक ५० प्रदूषित शहरांमधील तब्बल ३५ शहरे एकटय़ा भारतवर्षांत आहेत यात अजिबात आश्चर्य नाही. तसेच जगातील सर्वात प्रदूषित शहरही भारतातील राजस्थानातील भिवडी हे असावे, यातही काही धक्कादायक नाही, हे ओघाने आलेच. स्वित्झर्लंड येथील ‘आयक्यू एअर’ या संस्थेने जागतिक हवेच्या गुणवत्तेबाबतचा २०२१ या वर्षांतील अहवाल सादर केला. तो भारतासाठी तरी डोळय़ात अंजन घालणारा आहे. हवेतील प्रत्येक घनमीटरमध्ये स्वच्छ हवेचे प्रमाण किती असावे, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही पाहणी करण्यात आली. त्यानुसार जगातील शहरांमधील हवेच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली. त्यासाठी जगातील ११७ देशांमधील सहा हजार ४७५ शहरे निवडली गेली. त्यातील पहिल्या पाच देशांमध्ये बांगलादेश, छाड, पाकिस्तान, कझाकिस्तान आणि भारत यांचा समावेश आहे. गेल्या काही दशकांत आपल्याकडे नागरीकरणाचा वेग वाढतो आहे. त्याला वेसण घालण्यासाठी आवश्यक कायदे- नियम, दूरदृष्टीचे नियोजन या पातळय़ांवर भारत हा देश सातत्याने अनुत्तीर्ण ठरत आला आहे. देशाची राजधानी असलेले दिल्ली हे शहर तर जगातील पहिल्या पाच प्रदूषित शहरांमध्ये आहे. प्रदूषित शहरांच्या या यादीत महाराष्ट्रातील नवी मुंबई ७१व्या, चंद्रपूर ११३ व्या आणि मुंबई १२४ व्या स्थानावर आहेत. पिंपरी चिंचवड (१३५), पुणे (१९६), नाशिक (२१५ आणि बोरिवली (२५५) यांचाही या यादीत समावेश आहे. जगातील अन्य देशांमध्ये हा प्रश्न ‘आ’ वासून उभा राहण्यापूर्वीच उपाययोजना करण्यास सुरुवात होते आणि त्याचा परिणाम तेथील जीवनमानावरही होतो. भारताने आजवर या संदर्भात केलेले कायदे आणि त्याची अंमलबजावणी याबाबतची अवस्था इतकी भयावह आहे, की यापुढील काळात त्यात फार मोठी सुधारणा वेगाने होण्याची शक्यता शून्य!

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Global air pollution iqair world air quality report indian cities with most polluted air zws
First published on: 24-03-2022 at 01:09 IST