जोसेफ बॉइस यांनी जिवंत झाडांचीच कलाकृती केली, ओटो हुडेक यांनी झाडांचा जीवनसंघर्ष पाहिला. या कलाकृतींमधून, झाडाकडे कसं पाहायचं याचंही उत्तर मिळतं…

एखादे गाव राजधानी होण्यासाठी केवळ राज्यकर्त्यांची इच्छा नव्हे तर भौगोलिक घटक कसे महत्त्वाचे ठरतात याचे ठळक उदाहरण म्हणजे दिल्ली. भारतातील पहिले मोठे साम्राज्य मौर्यांचे. त्यामुळे त्यांची राजधानी पाटलीपुत्र ही खऱ्या अर्थाने भारताची पहिली राजधानी म्हणता येईल. त्यांच्यानंतर शुंग व गुप्त साम्राज्यातही तीच राजधानी होती. मात्र काही काळ शुंगांनी विदिशा आणि गुप्तांनी उज्जैन तसेच अल्पकाळ अयोध्या ही राजधानी केली. वर्धन घराण्याच्या काळात कनोज तर पुढे तोमर काळात दिल्ली भारताची राजधानी बनली. तिथून पुढे हजार-बाराशे वर्षांत दिल्ली अनेक वेळा विविध नावांनी वसवली गेली, नामशेष झाली आणि पुन्हा ऊर्जितावस्थेस आली.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geography of capital delhi amy
First published on: 25-05-2024 at 04:31 IST