‘हरिद्वारच्या या सभामंडपात जमलेल्या संन्यासी व ब्रह्मचारी बंधू भगिनींनो, गेले वर्षभर तुम्ही या आश्रमात राहून धर्म व योगाविषयीचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्याबद्दल अभिनंदन!(प्रचंड टाळय़ा) आजच्या संन्यास सोहळय़ानंतर तुम्ही एका नव्या जीवनाला प्रारंभ करीत आहात. जे भारताला जागतिक गुरू बनवण्यासाठी मदत करणार आहे. सनातन धर्माचा प्रसार हाच भारतवर्ष व जगाचा उद्धार करण्याचा एकमेव कल्याणकारी मार्ग आहे. यावरची तुमची श्रद्धा किती अढळ आहे, याची प्रचीती प्रशिक्षणकाळात मला आली. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी वर्षभरापूर्वी दिलेली जाहिरात तुम्हाला आठवत असेल. त्यात तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केले की तुमच्या उर्वरित जीवनाची आम्ही काळजी घेऊ असे नमूद केले होते. आज त्याबद्दलच विस्ताराने सांगण्यासाठी मी उभा आहे. इतिहास बघितला तर व्यापारातूनच धर्मप्रसार व विस्तार झाला आहे. तुमच्या संन्यस्तपणाला व्यापाराशी जोडणे हे मी माझे इतिकर्तव्य समजतो. यापुढे तुम्हाला व्यापारासोबतच धर्मप्रसाराचे काम करायचे आहे. त्यासाठी आमच्या पीठाने अनेक आकर्षक योजना तयार केल्या आहेत. ज्या तरुणांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले त्यांना विदेशात पाठवले जाईल. तिथे आमच्या पीठातर्फे तयार करण्यात आलेली औषधे इ.च्या विक्रीसाठी दालन उभारून दिले जाईल. नफ्यातील दहा टक्के रक्कम तुम्हाला दिली जाईल. खर्च भागवून उरलेली रक्कम तुम्ही धर्मप्रसारासाठी वापराल याची खात्री आहे. ज्यांनी हे प्रशिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केले. त्यांच्यासाठी तीच योजना देशांतर्गत पातळीवर असेल. जे द्वितीय व तृतीय श्रेणीत आहेत त्यांनी निराश होऊ नये. त्यांना देशभरात कुठे ना कुठे पीठाच्या वस्तूविक्री दालनात नोकरी दिली जाईल.
Already have an account? Sign in