विनोबांचे समग्र जीवन शांती आणि क्रांती अशा दोन टप्प्यांमध्ये पाहता येते. गांधीजींच्या सहवासात त्यांनी साम्ययोगाचे अंतर्मुख होऊन दर्शन घेतले. ते होते शांतिपर्व. त्यांच्यानंतर समाजाभिमुख होत साम्ययोगाची साधना केली. भूदान यज्ञ हे त्या साधनेचे प्रकट रूप होते. ते क्रांतिपर्व होते. क्रांतीची ही उभय रूपे मिळून विचारक्रांती म्हणजेच अिहसक क्रांती जन्माला येते. विनोबांच्या शब्दांत सांगायचे तर ही संक्रांतीची पद्धत झाली. संक्रांती म्हणजे संपूर्ण क्रांती अथवा सम्यक् क्रांती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भूदान यज्ञाच्या निमित्ताने या विचारक्रांतीचे अनोखे दर्शन जगाला झाले. या सम्यक् क्रांतीने पुढे वेगळे वळण घेतले आणि आपल्याला तिचा विसर पडला. आपली कार्य करण्याची पद्धत पुढच्या पिढीसाठी अडचण होऊ नये यासाठी त्यांनी क्षेत्रसंन्यासही घेतला. अर्थात त्यांचा क्षेत्रसंन्यास हे काही एकमेव कारण नव्हते. तथापि विनोबा निवृत्तीच्या वाटेवर चालत होते. त्यांचे कार्य पुढे जाण्याऐवजी वेगळय़ा वाटेने गेले.आज त्या क्रांतिपर्वाच्या आठवणी तेवढय़ा आहेत. भूदान यज्ञ नावाच्या यज्ञाच्या अनुषंगाने पुढे आलेल्या कथा एखाद्या महाकाव्यातील उपाख्यानांप्रमाणे आहेत. उपाख्याने मूळ काव्यापेक्षा सरस असतात. भूदान यज्ञातील मनोज्ञ कथा तसा प्रत्यय देतात.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta samyog acharya vinoba bhave overall life was peace and revolution amy
First published on: 05-12-2022 at 01:12 IST