‘अन्नसुरक्षा’ हा अनुच्छेद २१ मधील जगण्याच्या हक्काचा भाग ठरल्यावर, गरजूंना मोफत धान्य ही राज्ययंत्रणेची जबाबदारी ठरली..

पं. जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, जोवर इथला सामान्य माणूस भुकेने तळमळत असेल तोवर आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळाले आहे, असे म्हणता येणार नाही. नेहरू बोलत होते त्या काळात, स्वातंत्र्याच्या उंबरठय़ावर करोडो लोक भुकेने हैराण होते. पुरेसे अन्न प्रत्येकाला मिळत नव्हते. नेहरूंनी उपासमारी संपावी यासाठी धोरणात्मक पातळीवर अनेक निर्णय घेतले. नेहरूंचे १९६४ ला निधन झाले तोवर देश अन्न उत्पादनाच्या पातळीवर मोठय़ा प्रमाणावर सक्षम झालेला होता. तरीही वितरणाचा मुद्दा होताच. मुळात संविधानसभेतही समाज-आर्थिक न्यायासाठी अन्नसुरक्षेच्या अधिकारासह इतर अधिकारांचाही मूलभूत हक्क म्हणून विचार केला जावा असा नेहरूंचा आग्रह होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्याला दुजोरा होता. एवढेच नव्हे तर के. एम. मुन्शी यांनी ‘कामगारांचे हक्क’ या शीर्षकासह मसुदा तयार केला होता; मात्र अखेरीस या साऱ्या अधिकारांच्या संदर्भाने असलेल्या तरतुदींचा राज्यसंस्थेसाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या भागात (त्यापैकी अन्नसुरक्षेच्या मुद्दय़ाचा अनुच्छेद ४७ मध्ये) समावेश झाला.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta sanvidhan bhan constitution food security right to live state machinery amy
First published on: 27-05-2024 at 04:54 IST