डॉ. विवेक बी. कोरडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा किंवा त्या लगतच्या शाळेत समायोजित करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. तसे पत्रच महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागातून २१ सप्टेंबर रोजी शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालकांना आले आहे. या पत्राद्वारे शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालकांना सरळ सरळ खडसावत शासनाने विचारले आहे की, ‘राज्यात ० ते २० विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या शाळा किती आहेत, सदर शाळा बंद करणेबाबत विभागाची कार्यवाही कोणत्या पातळीवर आहे?’ या पत्रातील शासनाची भाषा बघितली तर आपण त्यावरून निष्कर्ष काढू शकतो की सरकारने आता राज्यातील ग्रामीण भागांतील, खेड्यापाड्यांतील, दुर्गम व डोंगराळ प्रदेशांतील असंख्य जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचे निश्चित केले आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Because of economic or social issue government closing zilla parishad schools asj
First published on: 07-10-2022 at 13:38 IST