ज्या वानखेडेवर भारताने २०११ साली विश्वचषक उंचावला..त्याच वानखेडेवर गुरूवारी भारतीय संघाला सामोरे जावे लागलेल्या पराभवामुळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एका कटू आठवणीची नोंद झाली. ( Full Coverage || Trending || Photos )
भारताला वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सात विकेट्सने पराभवला सामोरे जावे लागले. भारतीय संघाच्या पराभवाची पाच कारणे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिमन्सची नाबाद ८२ धावांची खेळी-
वेस्ट इंडिजसमोर १९३ धावांचे आव्हान उभारल्यानंतर बुमराहने विस्फोटक ख्रिस गेलला स्वस्तात माघारी धाडून मोठे यश मिळवून दिले होते. मात्र, विंडीजने आपल्या भात्यात खास गुरूवारच्या सामन्यासाठी लेंडन सिमन्स नावाचे अस्त्र दाखल केले होते. मुंबई इंडियन्सकडून खेळताना सिमन्सने वानखेडेवर चांगल्या धावा कुटल्या होत्या. हाच इतिहास ओळखून विंडीजने सिमन्सला संघात स्थान दिले आणि त्यानेही आपली निवड सार्थ ठरवून ५१ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकार ठोकत नाबाद ८२ धावांची मॅच विनिंग खेळी साकरली.

मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc t 20 world cup five reasons for indias defeat against west indies
First published on: 31-03-2016 at 23:56 IST