जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरामध्ये ४४५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा आता १० हजार ४१९ इतका झाला आहे.

जिल्ह्य़ात शुक्रवारी १८ करोना बाधितांचा मृत्यू झाल्याने करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३४२ झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात एकाच दिवसात ४४५ नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला आहे. त्यामध्ये ठाणे शहरात एकात दिवसात तब्बल १५२ रुग्ण आढळून आले आहेत. तर, नवी मुंबई शहरात ८६, कल्याण-डोंबिवली शहरात ५२, भिवंडी शहरात २०, अंबरनाथ शहरात १७, उल्हासनगर शहरात ४०, बदलापूरमध्ये ७, मीरा-भाईंदर शहरात ४६ आणि ठाणे ग्रामीणमध्ये २५ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच शुक्रवारी जिल्ह्य़ात १८ करोनाबाधितांचा मृत्यु झाला असून त्यामध्ये ठाणे शहरातील ५, नवी मुंबईतील ४, मीरा-भाईंदरमधील ४, भिवंडीतील २, ठाणे ग्रामीणमधील २ तर उल्हासनगर शहरातील १ रुग्णाचा समावेश आहे.