पालघर झुंडबळी प्रकरणी सीआयडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. दोन साधू आणि एका चालकाच्या हत्येप्रकरणी सीआयडीकडून कोर्टात ४९५५ पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. १६ एप्रिलच्या रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी १५४ जणांना अटक केली असून ११ अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच पाच पोलिसांना निलंबित करण्यात आलं असून ३० हून अधिक बदल्या करण्यात आल्या आहेत. पालघरमधील घटनेनंतर राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. सोबतच राज्य सरकारवर टीका होऊ लागली होती. यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. सीयआडीकडून एएनआयला देण्यात आलेल्या माहितीनुसार, “पोलीस उपअधीक्षक आणि तपास अधिकारी विजय पवार यांनी डहाणू कोर्टात १२६ आरोपींविरोधात ४९५५ पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे”. The CID Team examined 808 suspects & 118 witnesses to collect strong evidence against the accused. 154 persons were arrested and 11 juveniles in conflict with law, were detained. None of the accused has been released on bail so far: CID Crime, Pune #Maharashtra — ANI (@ANI) July 16, 2020 सीआयडीकडून आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा करण्यासाठी ८०८ संशयितांची चौकशी करण्यात आली असून १०८ साक्षीदांरांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी १५४ जणांना अटक करण्यात आलेली असून ११ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. कोणत्याही आरोपीला जामीनावर सोडण्यात आलेलं नाही अशी माहिती सीआयडीने दिली आहे.