लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभुळ जलशुध्दीकरण केंद्र आणि बारवी गुरुत्ववाहिनी देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवारी (ता.१८) रात्री १२ आणि शुक्रवारी (ता. १८) रात्री १२ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिका निवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, उल्हासनगर, तळोजा औद्योगिक क्षेत्र, लगतच्या ग्रामपंचायंतींचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Flood water in the Mohili Water Purification Center of the Kalyan-Dombivli Municipality
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या मोहिली जलशुध्दीकरण केंद्रात पाणी, पुराचे पाणी ओसरेपर्यंत उपसा पंप बंद
Sangli, Evacuation, flood, Krishna,
सांगली : पूरबाधित भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू; कृष्णा, वारणा पात्राबाहेर
Animal Husbandry department
पिंपरी : ‘पशुसंवर्धन’ची १३ एकर जागा पिंपरी महापालिकेकडे; ‘या’ नागरी सुविधा होणार
Khadakwasla dam chain is 61 percent full accumulating 17.82 TMC of water
खडकवासला धरण साखळी ६१ टक्के भरली, १७.८२ टीएमसी इतका पाणीसाठा जमा
Illegal constructions rampant in Dombivli MIDC
डोंबिवली ‘एमआयडीसी’त बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट
Mumbai Metropolitan Region Development Authority will set up the project in Palghar alibagh Mumbai
पालघर, अलिबाग एमएमआरडीएकडे! विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती
Kolhapur panchaganga river marathi news
कोल्हापुरात कृषी अधिकारी बांधावर; पंचगंगेच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ
Water scarcity, West Vidarbha,
पश्चिम विदर्भात पाणीबाणी, पावसाळ्यातही टँकरच्या संख्‍येत वाढ; १०५ गावांना टँकरने पाणीपुरवठा

आणखी वाचा-मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली

एमआयडीसीच्या बारवी धरणातून आणि जांभूळ जलशुध्दिकरण केंद्रातून ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई शहरांना, औद्योगिक विभागाला दररोज पाणी पुरवठा केला जातो. गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ या कालावधीत बारवी गुरुत्व वाहिनी आणि जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या दुरुस्तीच्या कालावधीत गुरुत्व वाहिनी आणि शुध्दीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही यंत्रणांमधून संबंधित शहरांना होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदमुळे शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिक, उद्योजकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवावा, असे आवाहन एमआयडीसीतर्फे करण्यात आले आहे.