लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मालवण येथील घटना दुर्दैवी आहे. परंतु त्यावर राजकारण करणे हे अधिक दुर्दैवी आहे. घरी बसलेले आता रस्त्यावर उतरत आहेत. परंतु जनता सुज्ञ आहे. जनता यांना कायमचे घरी बसवेल अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष केली.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदार संघातील विविध वास्तूंचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत. ज्या व्यक्तीने पुतळ्याचे काम केले आहे, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आणखी वाचा-ठाणे : लग्न जुळविणाऱ्या ॲपच्या माध्यमातून ओळख, अन् ९५ हजारांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मालवणमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. पण त्या घटनेचे राजकारण करणे हे त्यापेक्षाही दुर्दैवी आहे. जनता सुज्ञ आहे. त्यांना माहिती आहे. जे घरी बसले होते ते आता रस्त्यावर आले आहेत. करोनामध्ये, महापुरामध्ये यांनी नागरिकांना मदत केली असती तर नागरिकांनी त्याची आठवण ठेवली असती. मात्र, आता सर्व राजकारण आहे. पण जनता देखील सुज्ञ आहे. येणाऱ्या निवडणुकीत ते यांना रस्त्यावर आणतील आणि कायमचे घरी बसवतील” अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष केली.