ठाणे : कळवा येथे महावितरणकडून ठाणे शहरात केला जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे शहरातील ४० टक्के भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. ऐन उन्हाळ्यात विद्युत पुरवठा बंद झाल्याने नागरिकांचे हाल झाले. दुपारी ४ नंतरही विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता.

हेही वाचा… लोकसभा निवडणुक काळात भाजपाची राम गर्जना, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ‘राम गर्जना’गीताचे अनावरण

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”

हेही वाचा… डोंबिवलीत निळजे येथे नरेंद्र मोदींची विनापरवानगी जाहिरात लावणाऱ्या जाहिरात एजन्सीवर गुन्हा, आय प्रभागाकडून कारवाई

महावितरणच्या कळवा येथून ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरांना विद्युत पुरवठा केला जातो. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास काही तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ठाणे शहरातील नौपाडा, पाचपाखाडी, जुने ठाणे, वागळे इस्टेट परिसराचा काही भाग, कोलशेत येथील काही भागाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. ऐन उन्हाळ्या विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिक हैराण झाले आहे. नोकरदार, व्यवसायिकांच्या कामकाजावरही त्याचा परिणाम झाला आहे. लोकवस्तीमध्ये राहणारे नागरिक घरातून बाहेर पडत आहेत.