कल्याण – डोंबिवली जवळील दावडी गावातील एका विकासकाची नऊ वर्षापूर्वी पैशाच्या वादातून चार जणांनी हत्या केली होती. या प्रकरणातील चार जणांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पी. आर. अस्तुरकर यांनी जन्मठेपेची आणि १४ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. गणेश मनिया चव्हाण (३६) असे हत्या झालेल्या विकासकाचे नाव आहे. ते बांधकाम व्यावसायिक होते. जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांमध्ये दत्तू गोपाळ पवार (४०), स्वप्निल उत्तम पडवळ (३४) आणि कुमार भिमसिंग चव्हाण (४२), संतोष भिमसिंग चव्हाण (३४) या दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. अन्य आरोपींमध्ये एका रिक्षा चालकाचा समावेश होता. परंतु, न्यायालयाने उलटतपासणीच्या वेळी तपासातील काही त्रृटींची दखल घेऊन रिक्षा चालकाची निर्दोष मुक्तता केली.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या तरूणाविरूध्द गुन्हा

Akot Court, Three Family Members to Death, Akot Court Sentences Three Family Members to Death, Brutal 2015 Land Dispute Murders, akola news, marathi news,
शेती वाटणीच्या वादातून चार जणांची निर्घृण हत्या, एकाच कुटुंबातील तीन जणांना फाशीची शिक्षा
Supreme Court, reforms,
यंत्र हवेच आणि पेटीसुद्धा..
Maharashtra State Cooperative Bank, Maharashtra State Cooperative Bank Scam Case, Complainants Seek High Court Intervention, SIT Probe, ajit pawar, sunetra pawar, rohit pawar, marathi news,
शिखर बँक घोटाळा : तपास बंद करण्याच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर मूळ तक्रारदारांची उच्च न्यायालयात मागणी
आरटीई कायद्यातील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती, एक किमी परिघातील खासगी शाळांना सूट देण्यावर बोट
Anuj Thapan, suicide,
अनुज थापन याची आत्महत्या नाही, मृत्यूची सीबीआय चौकशी करा, मागणीसाठी अनुजच्या आईची उच्च न्यायालयात याचिका
mumbai high court gang rape marathi news
गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
India abortion law
गर्भधारणेनंतर ३० आठवड्यांपर्यंत गर्भपातास परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; भारतीय गर्भपात कायदा काय आहे?
Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा

या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपी होते. एक जण खून झाल्यानंतर फरार झाला. दुसरा तात्पुरत्या जामिनावर बाहेर होता. तोही नंतर बेपत्ता झाला. त्यामुळे हे दोन्ही आरोपी सुटकेपासून तात्पुरते बचावले आहेत. फरार दोन्ही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अतिरिक्त सरकारी वकील ॲड. कदम्बिनी खंडागळे यांनी सांगितले, विकासक गणेश चव्हाण यांनी आरोपी संतोष चव्हाण यांना दोन लाख रूपये उसने दिले होते. आपले पैसे परत द्यावेत म्हणून विकासक चव्हाण आरोपी संतोष यांच्याकडे तगादा लावत होते. वेळकाढूपणा करून संतोष पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. विकासक चव्हाण सतत पैसे मागत असल्याने त्याचा राग संतोषला होता. पैसे देण्याचा कायमचा त्रास संपविण्यासाठी संतोष चव्हाणने इतर आरोपींच्या सहकार्याने विकासक गणेशला ठार मारण्याचा कट रचला. सप्टेंबर २०१५ मध्ये मयत विकासक गणेश दावडी गावातील रस्त्यावरून जात असताना आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याला ठार मारले. त्याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला डाॅक्टरने मृत घोषित केले. या प्रकरणात एकूण २१ साक्षीदार तपासण्यात आले होते. अतिरिक्त सरकारी वकील खंडागळे, साहाय्यक सरकारी वकील ॲड. रचना भोईर यांनी या प्रकरणात सरकार पक्षातर्फे काम पाहिले. पोलीस ठाणे व न्यायालय यांच्या मध्ये सादरकर्ता म्हणून हवालदार ए. आर. गोगरकर यांंनी काम पाहिले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. ढिकले यांनी केला होता.