ठाणे : महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कुठल्याही काँग्रेस नेत्याने बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिलेली नाही, असा आरोप खासदार मिलिंद देवरा यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना केला. तसेच काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना हिंदू विचारधारा आवडत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

ठाणे येथील रेमंड कंपनीच्या मैदानात शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या युवासेना राज्यस्तरीय मेळाव्यात बोलताना खासदार मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस नेत्यांवर टीका केली. वीस वर्षांपूर्वी मी काँग्रेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळाचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले होते पण, ते आलेच नाहीत. त्यांना हिंदू विचारधारा आवडत नाही, असा आरोप खासदार देवरा यांनी केली.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Parli Sarpanch accident shiv sena ubt group
Beed Crime: ‘बीड जिल्हा केंद्रशासित प्रदेश करा’, सरपंचाच्या अपघातानंतर ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी
Chandrakant Khaire
Chandrakant Khaire : “हात जोडून विनंती करतो, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका”, चंद्रकांत खैरेंचं व्यासपीठावर कार्यकर्त्यांना दंडवत
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Five former corporators of Thackeray group join BJP flexes against them started in Pune
ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश होताच त्यांच्या विरोधात पुण्यात लागले फ्लेक्स

हेही वाचा >>>डोंबिवली : शिळफाटा रस्ता रविवारी अवजड वाहनांसाठी बंद, प्रीमिअर मैदानातील बालाजी महोत्सवासाठी वाहतूक विभागाचा निर्णय

तरुण वर्ग म्हणजे देशाचे भविष्य आहे. तरुण वर्गाकडे खूप वेगवेगळ्या चांगल्या कल्पना आहेत. पण त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी जे व्हिजन हवे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आहे. एक ऑटो रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा खूप आव्हानात्मक त्यांचा प्रवास आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील हिंदू सणांना, रूढी व परंपरेला प्रोत्साहन दिले आहे, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाली नाही म्हणून त्यांनी आपली विचारधारा बदलली. याला खऱ्या अर्थाने संधीसाधूपणा म्हणतात. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कुठल्याही काँग्रेस नेत्याने बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिलेली नाही. राममंदिर उद्घाटनाचे निमंत्रण यांनी नाकारले. हे तेच लोक आहेत, ज्यांनी आस्थेला नाकारले, अशी टीकाही त्यांनी केली.

Story img Loader