समुद्रात फेकलेला कचरा सुरूची बाग समुद्रकिनाऱ्यावर
महाकाय सागर आपल्या पोटात कधीच काही ठेवत नाही. त्याला जे अर्पण कराल, ते तो परत करतो. त्यामध्ये जे फेकाल, ते तितक्याच ताकदीने तो आपल्यावर भिरकावून देतो. वसईतील निसर्गरम्य सुरूची बाग समुद्रकिनाऱ्यावर आलेला कचरा हेच दाखवून देत आहे. निसर्गाबाबत बेपर्वा असलेल्या आणि पर्यावरणाबाबत बेजबाबदार असलेल्या माणसानेच हा कचरा समुद्रात फेकला, पण या ‘रत्नाकरा’ने तो पुन्हा माणसालाच अर्पण केला.
* सुरूची बाग समुद्रकिनाऱ्यावर भरतीच्या लाटेत मोठय़ा प्रमाणावर मानवनिर्मित कचरा वाहून आला असून त्यामुळे हा किनारा अस्वच्छ झाला आहे.
* वसईचे नैसर्गिक वैभव असणारा हा किनारा अस्वच्छ झाल्याने पर्यावरणप्रेमींनी खंत व्यक्त केली आहे.
* या ठिकाणी फिरायला येणारे पर्यटक या ठिकाणीच प्लॅस्टिकच्या पिशव्या, बॉटल, कागद, खाद्यपदार्थ आदी मोठय़ा प्रमाणावर किनाऱ्यावर आणि समुद्राच्या पाण्यात फेकतात.
* वारंवार आवाहन करूनही येथे येणारे लोक कचरा फेकत असल्याचे दिसून आले आहे.
* ओहोटीत हा कचरा समुद्रात वाहून जायचा; परंतु गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे मोठी भरती आली आणि हा सगळा कचरा पुन्हा समुद्राच्या किनाऱ्यावर आला आहे.
* मोठय़ा प्रमाणात येथे कचरा आल्याने येथे दरुगधी निर्माण झाली आहे, त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांत येथे पर्यटकांची संख्याही घटली आहे.