ठाणे : घोडबंदर मार्गालगत असलेल्या महत्त्वाचा कापूरबावडी ते ढोकाळी हा बंद मार्ग अखेर ठाणे महापालिकेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत हा मार्ग खुला होणार आहे. हा मार्ग खुला करण्यात यावा यासाठी नागरिकांकडून मागणी केली जात होती. मार्ग खुला झाल्यानंतर कोलशेत, हायलँड, कापूरबावडी, ढोकाळी येथील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा मार्ग एका ‘ सुमित बाबा’च्या आदेशाने बंद केल्याची चर्चा ठाण्यात सुरू होती.

गेल्याकाही वर्षांमध्ये ठाण्यातील घोडबंदर, हायलँड, बाळकूम, कोलशेत, ढोकाळी आणि मनोरमानगर भागात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. या भागातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. घोडबंदर मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेने कापूरबावडी आणि माजिवडा चौकात काही बदल सूचवले होते. या बदलाचा भाग म्हणून ठाणे महापालिकेने येथील ढोकाळी, कोलशेत मार्गाला जोडणारा कापूरबावडी ते ढोकाळी हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची वाहतुक कापूरबावडी येथून हायलँड, ढोकाळी मार्गे सोडली जात होती. या वाहतुक बदलामुळे कापूरबावडी चौकात मोठी वाहतुक कोंडी होत होती.

Demolition, unauthorized part, mosque in Dharavi,
धारावीतील मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यास सुरूवात, ट्रस्टनेच सुरू केली तोडक कारवाई
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
female police attacked in police station with sharp blade in ulhasnagar
उल्हासनगरमध्ये महिला पोलिसाला पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
Monkeys nuisance to agriculture
कोकणात माकडांचा उपद्रव वाढला; ३५ लाख खर्च करुन वन विभाग माकडे पकडण्याची मोहीम हाती घेणार
yamuna taj mahal cracks heavy rain
ताजमहालचं वैभव धोक्यात; भिंतींना तडे, पाण्याची गळती अन् बरंच काही, नुकसानाची व्याप्ती किती?
tmc to install tire killers on roads in thane
विरुद्ध दिशेकडील वाहतुक रोखण्यासाठी ठाण्यात ‘टायर किलर’
on Monday man killed on the roof of a building in Kolshet
ठाण्यात शीर धडवेगळे करून एकाची हत्या
appoint developers to construct houses in slum Redevelopment Mumbai news
दोन लाख झोपु घरांची जबाबदारी पुन्हा विकासकांवरच?

हेही वाचा… उल्हासनगरात कलानी ताकदवान, श्रीकांत शिंदेंकडून टीम कलानीवर स्तुतीसुमने

काही महिन्यांपूर्वी कोलशेत भागात सेंट्रल पार्क आणि हायलँड भागात प्रशस्त मंदीर उभारण्यात आले आहे. त्यामुळे या पार्कमध्ये आणि मंदीरात येणाऱ्या वाहनांचा भार देखील मार्गावर वाढला होता. सुट्ट्यांच्या दिवसांत हायलँड, कोलशेत भागात मोठ्या वाहतुक कोंडीचा सामना ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. हा मार्ग खुला करण्यासाठी वाहतुक पोलिसांकडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि नागरिकांकडून देखील हा मार्ग खुला करण्यासाठी मागणी केली जात होती. परंतु महापालिकेकडून हा मार्ग खुला केला जात नव्हता. त्यामुळे येथील कोंडी सोडविताना वाहतुक पोलिसांच्या नाकी नऊ आले होते.

गेल्या आठवड्याभरात कापूरबावडी, हायलँड भागात वाहतुक कोंडीच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर अखेर उशीराने जाग आलेल्या ठाणे महापालिकेने येथील कापूरबावडी- ढोकाळी मार्गिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील दुभाजक हटविण्यात आले आहेत. येथे डांबरी रस्ता तयार करून येत्या एक ते दोन दिवसांत हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… डोंबिवलीत पालिका साहाय्यक आयुक्ताबरोबर सफाई कामगाराची अरेरावी

ठाणे शहरात ठिकठिकाणी मुख्य मार्गावर दुभाजक बसविण्यात आले आहेत. कापूरबावडी-ढोकाळी हा मार्ग देखील बंद करण्यात आला होता. हे दुभाजक ‘सुमित बाबा’ नावाच्या व्यक्तीच्या सूचनेवरून बसविण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. हा रस्ता देखील त्यांच्या सांगण्यावरून केल्याची चर्चा ठाण्यात सुरू होती. त्यामुळे रहिवाशांकडून मागणी करूनही रस्ता खुला केला जात नसल्याची चर्चा रंंगली होती.

शिवसेना- भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

रस्ता खुला करण्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांनीच पाठपुरावा केल्याने हा रस्ता खुला झाल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी परिसरात मोठे फलक उभारले आहे. तर भाजपचे पदाधिकारी दत्ता घाडगे यांनी सहा महिन्यांपासून आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करत असल्याचा दावा केला आहे.

हा रस्ता खुला करण्यात यावा यासाठी नागरिकांकडून मागणी केली जात होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हायलँड येथे सभेला आले असताना, त्यांचासोबत आम्ही चर्चा केली. त्यामुळे हा रस्ता खुला झाला. परंतु काही लोक फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका संजय भोईर यांनी केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे असे म्हणत त्यांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांचे नाव घेणे टाळले.

हेही वाचा… ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू

मागील सहा महिन्यांपासून आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून रस्ता खुला करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे ठाणे शहर जिल्हा फ्रेंड्स ऑफ भाजपचे संयोजक दत्ता घाडगे यांनी सांगितले. राज्यात भाजपची युती आहे. तन-मन-धनाने ही युती असायला हवी. परंतु ठाण्यात हे चित्र कमी प्रमाणात दिसते. ठाणे महापालिकेत केवळ एकाच पक्षाची ‘दादा’गिरी सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकी दिसून येत नाही असा आरोप त्यांनी केला.