ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेमधील मुख्य जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे ठाण्यातील काही भागांत बुधवारी २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

ठाणे येथील माजीवडा येथील लोढा धाम भागातील भारतीय राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूस असलेली महापालिकेच्या स्वत:च्या योजनेमधील दोन हजार मि.मी व्यासाची मुख्य जलवाहिनी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. हे काम बुधवारी हाती घेण्यात येणार असून यामुळे ठाण्यातील काही भागांचा पाणी पुरवठा बुधवार सकाळ ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत असा २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा – उल्हासनगर पालिकेचा ४०० कोटींचा दंड माफ; एमआयडीसीचा पाणीपट्टीवरील दंड माफ करण्याचा निर्णय

हेही वाचा – ‘पीएम किसान’ योजनेच्या लाभापासून ठाणे जिल्ह्यातील हजारो शेतकरी वंचित, महसूल विभागातून उडवाउडवीची उत्तरे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील माजीवडा, घोडबंदर रोड, पातलीपाडा, गांधीनगर, सिद्धांचल, ऋतुपार्क, जेलटाकी, सिद्धेश्वर, समतानगर, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, रामनगर, इटर्निटी, जॉन्सन, साकेत, रुस्तमजी वसाहत परिसर, कळव्याच्या आणि मुंब्र्याच्या काही भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.