संकटं जेव्हा येतात तेव्हा ती एकटी येत नाही. चहुबाजुंनी हल्ला करतात. परंतु आपण घाबरायचे नसते, शांत राहून संकटांचा सामना करायचा असतो. हे तत्वज्ञान आजवर अनेक पुस्तके, चित्रपट, प्रतिभाशाली लोकांच्या भाषणांमधून आपण ऐकलं आहे. परंतु या तत्वज्ञानचं एक जिवंत उदाहरण एका व्हिडीओ मार्फत आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.

असं काय आहे या व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ नावेद ट्रंबो आयआरएस या ट्विटर हँडलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक जिराफ तब्बल सहा सिंहांसोबत लढताना दिसत आहे. या सिंहानी चहुबाजुंनी जिराफवर हल्ला केला परंतु त्याने तब्बव पाच तास त्यांच्याशी संघर्ष करुन स्वत:ला वाचवले. हा जिराफ एखाद्या झाडाप्रमाणे पाच तास एकाच जागी स्तब्ध उभा होता. अखेर कुठलीही हालचाल होत नाही हे पाहून सिंह निघून गेले.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी या जिराफवर कौतुकाचा वर्षाव देखील केला आहे.