मुंबईमधील एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांनी केलेल्या २२,८४२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची सध्या देशभरामध्ये चर्चा आहे. मोठा घोटाळा करुन मुंबईतील हे कंपनीचे मालक गुजरातमध्ये पळून गेल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याच घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन आता मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नाराजी व्यक्त करणारं ट्विट करत, “नेमके अच्छे दिन आहेत कोणाचे?” असा प्रश्न उपस्थित केलाय. एबीजी शिपयार्ड घोटाळा प्रकरणामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय़ने) गुन्हा दाखल केला असून याच पार्श्वभूमीवर केदार शिंदेंनी सर्वसामान्यांकडे कर्जासाठी किती कागदपत्रे मागितली जातात याचाही दाखला दिलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घडलंय काय?
बँक घोटाळय़ाच्या हाताळलेल्या सर्वात मोठया प्रकरणात, भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाची कथितरीत्या २२,८४२ कोटी रुपयांनी फसवणूक केलीय. या कंपनीला २८ बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्जाची सुविधा मंजूर करण्यात आली होती व त्यापैकी स्टेट बँकेचा वाटा २४६८.५१ कोटी रुपयांचा होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abg shipyard sbi bank fraud scam kedar shinde tweet scsg
First published on: 14-02-2022 at 11:02 IST