India – China Soldiers Fact Check Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आला, या व्हिडिओसह असा दावा करण्यात आला आहे की, चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशात २० किलोमीटर आत घुसखोरी केली आहे, तिथे त्यांनी नागरिकांना दोन तासांत परिसर रिकामा करण्यास सांगितेल आहे, तसेच असे न केल्यास चीन सैन्याने लोकांना युद्धाची धमकी दिल्याचाही दावा केला आहे. पण खरंच अशी कोणती घटना या काळात घडली का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ..
काय होत आहे व्हायरल ?
एक्स युजर @Afaq_Ahmad ने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे.
इतर युजर्स देखील समान दाव्यांसह हा व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि त्यातून मिळालेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.
यावेळी रिव्हर्स इमेज सर्च करताना आम्हाला Miyon Tayeng MT या युट्यूब चॅनलवरील एक व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ चार वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता.
भारतीय लष्कराचा अधिकारी शांतपणे सांगतो की, हा भाग भारताचा आहे. त्यावर चिनी सैनिक असा युक्तिवाद करतोय की, त्यांच्या नकाशानुसार तो त्यांचा आहे. भारतीय लष्कराचा अधिकारी त्यांना पुढे असेही सांगतो की, चिनी सैन्य भारतीय हद्दीत २० किलोमीटर आत घुसले आहे आणि त्यांना उत्तरेकडे परत जाण्यास सांगतोय. त्यावर चिनी सैन्य सकाळी परत जाऊ अशी माहिती देतोय.
हा व्हिडिओ डिफेन्स टुडे या युट्यूब चॅनलने देखील प्रसारित केला होता.
निष्कर्ष:
चिनी सैनिकांनी अनवधानाने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याच्या घटनेनंतर भारतीय आणि चिनी सैन्यांमधील संवादाचा एक जुना व्हिडिओ आता अलीकडील म्हणून व्हायरल केला जात आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.