Viral video: मुंबईत वाहतूक पोलिसांकडून अरेरावी होत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात काही नागरिक पोलिसांच्या वागण्यावर नाराजी व्यक्त करतात. तर काही व्हिडीओमध्ये पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असल्याचं दिसत आहे, तर काही ठिकाणी नागरिक पोलिसांशी वाद घालताना दिसत आहेत. दरम्यान सध्या कल्याणमधून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये भर रस्त्यात ऑन ड्युटी ट्रॅफिक पोलिसांनी एका व्यक्तीने बेदम मारहाण केलीय. याचा संतापजन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करणं हे प्रत्येक वाहन चालकासाठी बंधनकारक आहे. वाहतूकीचे नियम न पाळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र काहीवेळा वाहतूकाचे नियम मोडणारेच पोलिसांसमोर आडीबाजी करतात. अशावेळी वाद होतात आणि त्याचे परिणाम चुकीचे होतात. दरम्यान आता पुन्हा एका वाहतूक पोलीस चर्चेचा विषय बनलेत. एका तरुणीनं वाहतुकीचा नियम मोडला. त्यानंतर जे झाले ते मोबाईल कॅमेऱ्याद कैद झाले. कल्याण-शहाद रोडवरील मोठ्या वाहतूक कोंडीदरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिस सचिन ओंबासे आणि मयूर केणे नावाच्या दुचाकीस्वारामध्ये जोरदार हाणामारी झाली. वाहतूक कोंडी दरम्यान दुचाकीस्वार चुकीच्या बाजूने गाडी चालवत असल्याचा आरोप आहे आणि पोलिसांनी त्याला पकडले. प्रत्युत्तरात, बाईक स्वाराने रागाच्या भरात पोलिसांवर हल्ला केला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मयूर केणे सचिन ओंबासेचा शर्ट कॉलर धरून रस्त्याच्या मधोमध त्याला शिवीगाळ करताना दिसत आहे. पोलिसांनीही त्याला मारहाण करून प्रतिसाद दिला आणि हाणामारी सुरू झाली. अर्धा तास चाललेल्या या हाणामारीत, रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी मध्यस्थी करत हाणामारी थांबवली.ट्रॅफिक पोलिसांचे अनेक किस्से आपण ऐकले आहे. सोशल मीडियावरदेखील अनेक नागरिकांनी शेअर देखील केले आहेत. चुकीच्या गोष्टींवर लगाम घालणं आणि शिक्षा करण्याचं काम खाकीचं असतं मात्र काही असे महानग असतात जे नियमांचं उल्लंघन करत पोलिसांशी वाद घालतात.
पाहा व्हिडीओ
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील महात्मा फुले पोलिस ठाण्यात मयूर केणे यांच्याविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी अद्याप या वादावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. कल्याण-शहाद पुलावर वारंवार होणाऱ्या गर्दीबद्दल स्थानिकांनी तक्रार केली आहे आणि योग्य वाहतूक व्यवस्थापनाची मागणी केली आहे.