Satara Viral video: माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. आई जगातील सर्वात मोठा योद्धा आहे असं म्हटलं जातं, कारण तिची तुलना इतर कोणाशीच होऊ शकत नाही. ती स्वत:चा त्रास विसरुन आपल्या मुलांची काळजी घेत असते. आईच्या त्यागाच्या आणि शौर्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकत आणि पाहात असतो.पोटच्या मुलाला दगडाला बांधून मजुरी करणाऱ्या आईचा एक भयान वास्तव्य दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लहान मुलाला दगडाला बांधून आई मजुरीचे काम करते. सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वरमधील हा व्हिडीओ असून सध्या तो चर्चेत आला आहे.हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचं पाणी होईल…
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका मोलमजुरी करणाऱ्या आईने आपल्या तीन वर्षांच्या निष्पाप बाळाला दगडाला बांधून ठेवलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. आईच्या या कृतीमागे क्रूरता नसून असहायता आणि गरीबीचा आक्रोश आहे.

दरम्यान युट्युबर शितल दानवले यांनी यावेळी मुलाच्या आईला यासंदर्भात विचारले. मुलगा ३ वर्षांचा झाला तरी त्याला बोलता येत नाही. या मुलाला दवाखान्यात दाखवलं नाही का? असा प्रश्न त्याच्या आईला विचारण्यात आला तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर हृदय हलवून टाकणारे होते. या मुलाच्या आईने सरळ पैसे नाहीत त्यामुळे दवाखान्यात त्याला नेले नाही असे सांगितले. मजुरीचे काम करत असताना आपल्या नजरेपासून आपलं लेकरू लांब जाऊ नये यासाठी त्याच्या पायाला दगड बांधून काम करण्याची वेळ या आईवर आली.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Shital Danawale (@shitaldanawale)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिस्थितीनुसार आलेली गरिबी आणि याच गरिबीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करणाऱ्या महिलेचं आणि तिच्या लेकराचं भयान वास्तव्य युट्युबर शितल दानवले यांनी ब्रँड शेतकरी या यूट्यूब चॅनलवर दाखवले आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. युट्युबर शितल दानवले यांनी सांगितले की, ‘मी एक शेतकरी महिला आहे माझ्या परीने जेवढं करता आलं तेवढं मी केलं. या लेकराला बोलता यावं या लेकराला मदत मिळावी आणि शासनाने या लेकराकडे लक्ष द्यावं ही माझी विनंती आहे. शासनाने कामं केली किंवा नाही केली यापेक्षा जी कामे केली ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजेत अशी कामं करा हीच माझी विनंती आहे.’ अशी त्यांनी विनंती केली.